उद्रेक न्युज वृत्त :-आयपीएल(इंडियन प्रीमियर लीग) २०२५ च्या अंतिम सामन्याचा थरार आज,मंगळवार ३ जून रोजी संध्याकाळी साडेसात वाजे अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पंजाब किंग्ज(PBKS) वर्सेस रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यात खेळला जाणार आहे.सदरचा सामना रंगतदार होणार असून दोघांमधून ‘जो जिता वही सिकंदर’ ठरवला जाणार आहे.यातून तब्बल तीन वर्षांनंतर आयपीएलला एक नवीन चॅम्पियन मिळणार आहे.आयपीएलला शेवटचा नवीन चॅम्पियन २०२२ मध्ये मिळाला होता.जेव्हा गुजरात टायटन्सने अंतिम सामन्यात राजस्थानचा पराभव केला होता.बंगळुरू चौथ्यांदा आणि पंजाब दुसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहोचला आहे.परंतु दोन्ही संघांमधील हा पहिलाच अंतिम सामना असेल. आरसीबीने २००९,२०११ आणि २०१६ मध्ये अंतिम सामना गमावला आहे,तर पीबीकेएसने २०१४ मध्ये एकमेव अंतिम सामना गमावला होता.
आज आयपीएल अंतिम सामन्याचा थरार; जो जिता वही सिकंदर..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

