Tuesday, July 7, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआचारसंहितेचा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर कोणताही परिणाम होणार नाही- कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

आचारसंहितेचा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर कोणताही परिणाम होणार नाही- कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यात विधान परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्याने शेतकरी कर्जमाफीबाबत अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.महत्वाचे म्हणजे,आचारसंहिता कालावधीत सरकारचे देणे बंद असते,म्हणजेच विविध योजनांच्या माध्यमातून पैश्याचे वितरण करण्यात येत नाही.अश्यातच राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज,बुधवार २० मे रोजी शेतकरी कर्जमाफीवर मोठे भाष्य केले आहे.विशेषतः जून महिन्यात राज्यातील मुख्य खरीप हंगामाच्या पेरण्यांना सुरुवात होते.या काळात शेतकऱ्यांना बियाणे,खते आणि इतर शेतीकामांसाठी नव्या पीक कर्जाची आवश्यकता असते.परंतु,जुन्या कर्जाच्या बोज्यामुळे अनेक शेतकरी बँकांच्या दारात थकबाकीदार ठरले आहेत.हीच अडचण ओळखून सरकारने खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच म्हणजेच ३० जूनपूर्वी कर्जमाफीची अंमलबजावणी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना बँकांकडून पुन्हा नवीन पीक कर्ज मिळणे सुलभ होईल, त्यामुळे लागू झालेल्या आचारसंहितेचा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर कोणताही परिणाम होणार नसून,येत्या ३० जूनपूर्वी राज्यातील बळीराजासाठी कर्जमाफीची अधिकृत घोषणा केली जाईल,असे कृषिमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.कर्जमाफी हा सरकारचा पूर्वनियोजित आणि धोरणात्मक निर्णय असल्याने या प्रक्रियेत आचारसंहितेचा कोणताही कायदेशीर अडथळा येणार नाही.या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अत्यंत सकारात्मक असून, वित्तीय नियोजनाचा आढावा घेऊन लवकरच अंतिम निर्णय घेतला जाईल,असेही त्यांनी स्पष्ट केले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाघांचे हल्ले काही केल्या थांबेना..! ऐन शेतीच्या हंगामातच वाघाने घेतला एकाचा जीव..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या चिमूर तालुक्यातील खडसंगी (बफर)वनपरिक्षेत्र व प्रादेशिक वनक्षेत्राच्या सीमेलगतच्या बरडघाट शेतशिवारात वाघाने एका ५० वर्षीय शेतकऱ्यावर हल्ला चढवून जीव घेतल्याची घटना...

कृषी विभागामार्फत खरीप हंगाम-२०२६ साठी पीकस्पर्धेचे आयोजन.. – स्पर्धेतील विजेत्यांना तालुका,जिल्हा आणि राज्यस्तरावर प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांकाची बक्षिसे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील अन्नधान्य,कडधान्य व गळीतधान्य पिकांची उत्पादकता वाढविणे,प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे तसेच आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने कृषी विभागामार्फत खरीप हंगाम...

उद्यापासून गडचिरोली,आरमोरी व देसाईगंज येथे जादूटोणा विरोधी कायदा व अंधश्रद्धा निर्मूलनावर प्रबोधन कार्यक्रम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जादूटोणा विरोधी कायदा तसेच अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत समाजामध्ये जनजागृती व प्रबोधन व्हावे,या उद्देशाने गडचिरोली जिल्ह्यात विशेष प्रबोधन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या...

संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात १५ दिवस मनाई आदेश लागू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ मधील कलम ३७(१)(३)अन्वये ५ जुलै २०२६ रोजी रात्री १२.०१ वाजल्यापासून ते १९...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!