- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-राज्यात काही ठिकाणी सूर्याची उघडीप सुरू आहे.बऱ्याच जिल्ह्यात जीवाची लाहीलाही तर काही जिल्ह्यात गारवा निर्माण झाला आहे.अशातच भारतीय हवामान खात्याने(IMD)
राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे.मध्य महाराष्ट्र,मराठवाडा आणि विदर्भात वादळी पाऊस आणि गारपीटीची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.नाशिक, अहिल्यानगर,छत्रपती संभाजीनगर,बीड,जालना,पुणे, सातारा,अमरावती आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर गडचिरोली,गोंदिया,भंडारा,वर्धा व नागपूर जिल्ह्यांना आज बुधवार अवकाळी पावसाचा यलो अलर्ट जाहीर केला आहे.तर काही भागात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.अशातच धुळे जिल्ह्याच्या साक्री तालुक्यातील दहिवेल,पिंपळनेर येथे
आज,बुधवार २ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेच्या दरम्यान अवकाळी पावसासह गारपीटीने हजेरी लावली. गारपिटीने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. सकाळपासूनच वातावरणामध्ये उकाडा जाणवत होता,परंतु अवकाळी पावसाने काहीसा गारवा निर्माण केला.मात्र,तुरळक प्रमाणामध्ये गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.अनेक शेतकऱ्यांनी गहू कापून शेतात ठेवला होता.त्याचे देखील नुकसान झाल्याचे बोलले जात आहे. अर्धा तास झालेला पावसाने शेतकऱ्यांचा तोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
- Advertisement -

