Wednesday, June 10, 2026
Homeब्रम्हपुरीअबब...! अन् रुग्णाच्या किडणीतून निघाला अर्धा किलोचा खडा- ब्रम्हपुरी तालुक्यातील तळोधी येथील...

अबब…! अन् रुग्णाच्या किडणीतून निघाला अर्धा किलोचा खडा- ब्रम्हपुरी तालुक्यातील तळोधी येथील रुग्णाला किडणी स्टोनचा होता त्रास

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

ब्रम्हपुरी :- दिवसेंदिवसहोणाऱ्या खानपाणातील बदलांमुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होतांना दिसून येत आहेत.पूर्वी शंभर वर्षे आयुष्य जगणारे मानव आजच्या स्थितीत पन्नाशितच लुळकतात. महत्वाचे कारण म्हणजे आरोग्याची काळजी न घेणे वा त्याकडे दुर्लक्ष करून अनेक व्याधींना सामोरे जाऊन आजार बळावले जात असतात.अशाच प्रकारचे आजार ब्रम्हपुरी तालुक्यातील तळोधी येथील एका रुग्णाला किडणी स्टोनचा त्रास होता.किडनी स्टोनचा त्रास वाढत जाऊन लघवीतून रक्तस्राव होऊ लागला.अखेर सर्व तपासण्या केल्यानंतर ब्रह्मपुरी येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर तब्बल तीन तासांची शस्त्रक्रिया करून सुमारे अर्धा किलोचा खडा मूत्राशयातून बाहेर काढण्यात आला.

प्रभाकर कारू राऊत वय ५५ वर्षे रा.तळोधी असे सदर रुग्णाचे नाव आहे.त्यांना किडणीस्टोनचा आधीपासूनच आजार होता.पण एक महिन्यापूर्वी त्यांना अचानक जास्तच पोटात दुखायला लागले.लघवीतून रक्तस्राव होत असल्यामुळे त्यांनी तळोधी येथील खाजगी डॉक्टरांचा सल्ला घेऊन सोनोग्राफी,एक्स रे काढून घेतले. शस्त्रक्रियेचा सल्ला दिल्यानंतर त्यांनी लगेच आस्था हॉस्पिटल गाठले.तिथे डॉ.सुमित जयस्वाल व डॉ.जयंत निकोसे यांनी अगदी कुशलतेने तीन तासांची शस्त्रक्रिया पार पाडली.रुग्णाच्या मूत्राशयातून डॉक्टरांनी अर्धा किलोचा मुतखडा बाहेर काढला.दरम्यान,त्रास होत असतानाही आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याने असा आजार उदभवतो,असे डॉ.सुमित जयस्वाल यांनी सांगितले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर ‘त्या’ शेतकऱ्यास मदतीचा हात; मुख्यमंत्र्यांकडून दखल..

उद्रेक न्युज वृत्त  लातूर :-जिल्ह्याच्या देवणी तालुक्यातील बोंबळी खुर्द येथील शेतकरी काशिनाथ गायकवाड यांच्यावर काही दिवसांपूर्वी दुहेरी संकट ओढवले होते.शेतातील मशागतीची कामे सुरू असतांनाच वादळी...

विदर्भातील शाळांसाठी दिलासादायक निर्णय; शाळा सुरू करण्यास सात दिवसांची मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्याच्या विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट कायम असल्याने राज्य शिक्षण विभागाने दिलासादायक निर्णय घेतला आहे.नियोजित वेळापत्रकानुसार १५...

दुर्गम गडचिरोलीतील तब्बल ७८ विद्यार्थ्यांना देशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दुर्गम,नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात आलेला ‘मिशन-२००’ हा उपक्रम...

अखेर नदीत बुडालेल्या तीन तरुणांचे सापडले मृतदेह; उर्वरित दोन युवकांचा शोध सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या घुग्गुस शहरातील पाच तरुण म्हातारदेवी परिसरातील वर्धा नदीवर पोहण्यासाठी गेले असता काल सोमवारच्या रात्री उशिरापर्यंत घरी परतले नसल्याने नदीत बुडाल्याची भीती...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!