गोंदिया :-रेल्वेच्या धडकेत वन्यप्राण्यांचा मृत्यू होण्याचे प्रमाण वाढलेले असून वन्यजीव प्रेमी तसेच संबंधित विभागाकडून अपघातानंतर उपाययोजना आखण्यासंदर्भात आवाज उठवला जातो.त्यानंतर मात्र त्याचा विसर पडतो; अशी म्हणण्याची वेळ आली आहे.त्याचे कारणही तसेच आहे; नुसत्या एकट्या गोंदिया-बल्लारशा रेल्वे मार्गाचा विचार केला तर आतापर्यंत गोंदिया-बल्लारशा रेल्वे मार्गावर तब्बल १२५ वन्यप्राण्यांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.यात वाघासह इतर प्राण्यांचा सुद्धा समावेश आहे.त्यातच दरवर्षी या मार्गावर वन्यजीवांचा बळी जात असल्याने सदरचा मार्ग वन्यप्राण्यांसाठी धोकादायक ठरत आहे.गोंदिया-बल्लारशा हा रेल्वे मार्ग ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, उमरेड-कऱ्हांडला अभयारण्य,नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प या ‘कॉरिडॉर’ लगत जातो. हाच रेल्वे मार्ग पुढे जबलपूर आणि बालाघाटपर्यंत तर चांदाफोर्ट पुढे तेलंगणापर्यंत जातो.त्यामुळे या रेल्वे मार्गावरून बरेचदा वन्यप्राण्यांची वर्दळ असते.त्यामुळेच रेल्वे विभागाने २०१८ मध्ये वन्यप्राण्यांसाठी असुरक्षित रेल्वे मार्गांची यादी जाहीर केली होती व उपाययोजनेबाबतही शिफारसी केल्या होत्या.यात गोंदिया-बल्लारशा रेल्वे मार्गाचा सुद्धा समावेश होता परंतु,अद्यापही उपाययोजना केलेल्या नाहीत.त्यामुळे या रेल्वे मार्गावर वन्यप्राण्यांच्या मृत्यूची मालिका सुरूच आहे.वन्यप्राण्यांच्या संवर्धनासाठी या रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजूला तारांचे कुंपण,भुयारी मार्गासह इतर उपाययोजना करण्याची गरज आहे.पण त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
अपघात होताच आवाज उठवला जातो; त्यानंतर मात्र त्याचा विसर पडतो.. – रेल्वेच्या धडकेत वन्यप्राण्यांचा मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक

