- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-शेतातील कामे आटोपून ट्रॅक्टरने घराकडे परत जात असतांना अनियंत्रित झालेला ट्रॅक्टर थेट कालव्यात(मोठा नहर)पडून पलटी झाल्याने त्याखाली दबलेल्या तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना आज,रविवार १७ मे रोजी पहाटे सुमारास हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यातील अकोली गाव नजीकच्या शेत शिवारात घडली.ज्ञानेश्वर उर्फ माऊली माधव कदम वय १८ वर्षे,रा.अकोली, ता.वसमत,जि.हिंगोली असे अपघातात मृत पावलेल्या तरुणाचे नाव असून घरातील एकुलता एक मुलगा दगावल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
हिंगोली जिल्ह्यात सध्या खरीप हंगामपूर्व मशागतीची कामे सुरु असून ट्रॅक्टरद्वारे नांगरणी केली जात आहे. उन्हामुळे काही काळ दिवसाच्या वेळी व रात्रीच्या वेळी ट्रॅक्टरद्वारे नांगरणी केली जात आहे.दरम्यान,ज्ञानेश्वर हा ट्रॅक्टर घेऊन कामासाठी शेतात गेला होता.शेतातील कामे करून तो आज पहाटेच्या सुमारास घराकडे परत जात असतांना शेत शिवारातील कालव्याच्या रस्त्यावरून त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रॅक्टर ट्रॉलीसह कालव्यात पलटी झाला.यात ज्ञानेश्वर याच्या अंगावरच ट्रॅक्टरचे हेड पडल्यामुळे ती हेडखाली दबल्या गेला.त्याला बाहेर पडण्याची संधीही मिळाली नाही.त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.काही शेतकऱ्यांनी सदरचा प्रकार लक्षात येताच त्यांनी तात्काळ वसमत ग्रामीण पोलिसांना माहिती दिली.वसमत ग्रामीण पोलिस ठाण्याचे एपीआय गजानन बोराटे,बिट अंमलदार विजयकुमार उपरे, आंबादास विभुते,नामदेव बेंगाळ यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व क्रेनच्या मदतीने ट्रॅक्टर काढून त्याखाली दबलेला ज्ञानेश्वर याचा मृतदेह बाहेर काढला.घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून अकोली गावात शोककळा पसरली आहे.
- Advertisement -

