- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-हो नाही,हो नाही,म्हणता-म्हणता आज,गुरुवारी ५ डिसेंबरला मुंबईच्या आझाद मैदान या ठिकाणी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्याला सुरुवात होऊन अखेर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरला.यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची आणि गोपनियतेची शपथ घेतली.

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंनी शपथ घेण्यापूर्वी बाळासाहेब आणि आनंद दिघेंचे स्मरण केले.

यानंतर दुसरे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी देखील पद आणि गोपनियतेची शपथ घेतली.महत्त्वाचे म्हणजे,उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताच अजित पवार यांनी अनोखा विक्रम केला आहे. या शपथविधीसह सहाव्यांदा राज्याचे उपमुख्यमंत्री बनण्याचा मान अजित पवार यांना मिळाला आहे. अजित पवार यांच्या या विक्रमाची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.दरम्यान,तीन प्रमुखपदांसाठी हा शपथविधी सोहळा पार पडला.यावेळी इतरही मंत्र्यांना शपथ दिली जाईल का? अशी चर्चा सुरु होती. परंतू मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांशिवाय इतर कोणलाही आज शपथ देण्यात आली नाही.
- Advertisement -