Tuesday, July 7, 2026
Homeगडचिरोलीअखेर आरमोरीच्या वनखी येथील नळ पाणीपुरवठा योजना सुरू..

अखेर आरमोरीच्या वनखी येथील नळ पाणीपुरवठा योजना सुरू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्याच्या आरमोरी तालुक्यातील ग्रामपंचायत चामोर्शी माल अंतर्गत मौजा वनखी (वासाळा)येथील नळ पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आली असून,गावातील नागरिकांना पाणीपुरवठा उपलब्ध होण्यास सुरुवात झाली आहे. योजनेतील उर्वरित किरकोळ कामे लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी दिली आहे.
वनखी येथे जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली आहे.या योजनेमध्ये पुरवठा विहीर,स्वच्छता कामे,उर्ध्वनलिका,जलकुंभ,वितरण व्यवस्था व इतर पूरक कामांचा समावेश आहे.योजनेचे बहुतांश कामे पूर्ण झाले असून १६ मे २०२५ पासून चाचणी तत्वावर पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता. मात्र,९ जानेवारी २०२६ रोजी व्हॉल्व्ह लिकेज झाल्यामुळे पाणीपुरवठा बंद झाला होता.त्यानंतर संबंधित व्हॉल्व्हची दुरुस्ती करण्यात आली.दरम्यान,वीज देयक थकबाकीमुळे योजनेचा मीटर बंद करण्यात आल्याने पाणीपुरवठा सुरू करण्यात अडचण निर्माण झाली होती. या संदर्भात ग्रामपंचायत,कंत्राटदार,विद्युत विभाग आणि संबंधित अधिकाऱ्यांमध्ये वेळोवेळी चर्चा करण्यात आली.२८ एप्रिल २०२६ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात कंत्राटदाराची सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी वीज देयकाची थकबाकी तात्काळ भरून योजना सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार,५ मे २०२६ रोजी विद्युत विभागामार्फत देयकाची तृटीपूर्तता करून वीज देयक भरण्यात आले. योजनेचा मीटर थ्री फेजचा असतांनाही सुरुवातीला सिंगल फेज पुरवठा सुरू करण्यात आला होता.त्यानंतर ६ मे २०२६ रोजी पुन्हा लाईनमनमार्फत थ्री फेज वीजपुरवठा सुरू करण्यात आला.पुढे ७ मे २०२६ रोजी पाण्याची टाकी स्वच्छ करून गावात नळ पाणीपुरवठा सुरू करण्यात आला.वनखी येथील नागरिकांना नियमित व सुरळीत पाणीपुरवठा मिळावा यासाठी योजनेतील उर्वरित कामेही तातडीने पूर्ण करण्यात येणार असल्याचे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी कळविले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कार अपघातातील विमा नाकारणाऱ्या कंपनीला ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा दणका..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-ग्राहकांच्या हक्कांचे रक्षण करण्याकरिता राज्यातील प्रत्येक जिल्हा स्तरावर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग कार्यरत असून त्याद्वारे ग्राहकांच्या समस्यांचे निवारण करण्यात येते.याबाबत...

वाघांचे हल्ले काही केल्या थांबेना..! ऐन शेतीच्या हंगामातच वाघाने घेतला एकाचा जीव..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या चिमूर तालुक्यातील खडसंगी (बफर)वनपरिक्षेत्र व प्रादेशिक वनक्षेत्राच्या सीमेलगतच्या बरडघाट शेतशिवारात वाघाने एका ५० वर्षीय शेतकऱ्यावर हल्ला चढवून जीव घेतल्याची घटना...

कृषी विभागामार्फत खरीप हंगाम-२०२६ साठी पीकस्पर्धेचे आयोजन.. – स्पर्धेतील विजेत्यांना तालुका,जिल्हा आणि राज्यस्तरावर प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांकाची बक्षिसे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील अन्नधान्य,कडधान्य व गळीतधान्य पिकांची उत्पादकता वाढविणे,प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे तसेच आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने कृषी विभागामार्फत खरीप हंगाम...

उद्यापासून गडचिरोली,आरमोरी व देसाईगंज येथे जादूटोणा विरोधी कायदा व अंधश्रद्धा निर्मूलनावर प्रबोधन कार्यक्रम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जादूटोणा विरोधी कायदा तसेच अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत समाजामध्ये जनजागृती व प्रबोधन व्हावे,या उद्देशाने गडचिरोली जिल्ह्यात विशेष प्रबोधन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!