- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-शेतकऱ्यांनी शेतात कोणत्या पिकाची लागवड केली आहे; याची नोंद घेण्याकरिता शासनाच्या वतीने ई- पीक पाहणी नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे.पीकपेरा,नुकसान भरपाई व धान विक्री आदीच्या माहितीकरिता व अपडेट राहण्याकरिता ई-पीक पाहणी आवश्यक आहे.याकरिता १५ सप्टेंबर शेवटची तारीख आहे.हस्तलिखित माहितीवर बरेचदा अपडेटपणा राहत नाही.त्यासाठी शासनाने ई-पीक पाहणी नोंदणीचा आधार स्वीकारला आहे.हायटेक जमान्यात शेतकऱ्यांनीसुद्धा आपला सातबारा तांत्रिक घटकांचा अभ्यास घेऊन स्मार्ट मोबाइलच्या आधाराने ई पीक पाहणीअंतर्गत अपडेट राहण्याचे ठरवले आहे.
पीक नोंदणी न केल्यास होणारे तोटे👇
कर्ज प्रकरण सादर करता येणार नाही.पीक विमा मिळणार नाही.नुकसान झाल्यास भरपाईचे ई-पंचनामे होणार नाहीत. सातबारा निगडित योजनांचा लाभ घेता येणार नाही.खरेदी-विक्रीसाठी अडचण वाढतील.
अनुदानासाठी अडचण निर्माण होईल.शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर धान विकता येणार नाही तसेच चालू वर्षाचा सातबारा निघणार नाही.
शेतकरी बांधवांनी आपल्या मोबाइलवर ई-पीक पाहणी (डीसीएस) व्ही: ३.०.२ ॲप डाऊनलोड करून आपल्या पिकाची नोंदणी करावी.
शेतकऱ्यांना आपले रजिस्ट्रेशन मोबाइल क्रमांकावर ट्रान्सफर करण्यात आले आहे, अशी सूचना येत आहे. अशावेळी खातेदारांनी पीक पाहणी करताना सर्वप्रथम नवीन खातेदार निवडा वर जाऊन नवीन सांकेतांक प्राप्त झाल्यानंतर ही पीक पाहणी पूर्ण करून घ्यावी. काही समस्या आल्यास जवळच्या तलाठी कार्यालयात जाऊन संपर्क साधावा.
- Advertisement -

