Friday, September 11, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तविद्युत वितरण कंपनीचा ग्राहकांना जोरदार झटका..! दोन महिने बिल न भरल्यास सुरक्षा...

विद्युत वितरण कंपनीचा ग्राहकांना जोरदार झटका..! दोन महिने बिल न भरल्यास सुरक्षा ठेवीतून रक्कम करणार कपात..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-पूर्वी दोन महिने वा त्याहून अधिक महिने लाईट बिल भरले नाही तरीही चालत होते आणि काही दिवसांसाठी वीज पुरवठा खंडित करून संपूर्ण बिल भरल्यास वीज पुरवठा सुरळीत केला जात होता.मात्र,आता जुलै महिन्यापासून पूर्वीची चालत आलेली परंपरा बंद करून विद्युत वितरण कंपनीने थकीत बिल वसूल करण्याच्या नावाखाली नवा फंडा आणला आहे.विद्युत वितरण कंपनीच्या नव्या फंड्यानुसार आता ज्या वीजग्राहकांनी दोन महिन्यांचे विद्युत बिल भरलेले नाहीत,अश्यांच्या सुरक्षा ठेव म्हणून जमा असलेल्या ठेवीतून थकबाकीची रक्कम कपात केली जाईल,असा निर्णय विद्युत वितरण कंपनीने घेतलेला आहे.(सुरक्षा ठेव रक्कम ही आपल्याकडे आलेल्या लाईट बिलावर दिलेली असते)याची अंमलबजावणी जुलैपासून सुरू झाली आहे.महावितरण कंपनी आर्थिक अडचणीत सापडत असल्याचे कारण देत सदरचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे.त्यामुळे आता सलग दोन महिन्यांचे वीज बिल थकल्यास तिसऱ्या महिन्यात ग्राहकांच्या सुरक्षा ठेवीतून थकबाकीची रक्कम कपात केली जाणार आहे.सदरची रक्कम एकदा कपात झाली की,नंतर ग्राहकाला प्रथम सुरक्षा ठेवीची रक्कम व त्यानंतर बिलातील इतर शिल्लक रक्कम भरणे बंधनकारक असेल.रक्कम न भरल्यास ग्राहकाचा वीजपुरवठा खंडित केला जाईल.त्यानंतर ग्राहकाला पुरवठा पुन्हा सुरू करण्यासाठी सुरक्षा ठेव, बिलाची थकबाकी भरावी लागेल.शुल्क भरूनच वीज जोडणी पूर्ववत करता येणार आहे.सदरच्या निर्णयामुळे विद्युत ग्राहकांना एकप्रकारे जोरदार झटकाच मिळाला म्हणावे लागेल.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धरणात बुडालेल्या तरुण शेतकऱ्याचा सापडला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बैल पोळा सणाच्या एक दिवसापूर्वी धरण परिसरात बैल धुण्यासाठी गेलेला तरुण शेतकरी बुडाल्याची घटना काल,बुधवार ९ सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजेच्या...

सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन,वारसा हक्क,पदोन्नती व निवासाच्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करा- राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागरिकांचे आरोग्य आणि सार्वजनिक स्वच्छता राखण्यात सफाई कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे.त्यामुळे त्यांच्या वेतन,सेवा,आरोग्य, निवास व आर्थिक सुरक्षिततेशी संबंधित प्रलंबित प्रश्नांचा...

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत विद्यार्थ्यांमध्ये उत्तम मूल्यसंस्कार रुजविणे काळाची गरज-शिक्षणमंत्री दादाजी भुसे – ‘चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत आज विविध शाळांना प्रत्यक्ष भेटी.. – पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शाळेत केवळ पुस्तकी ज्ञान देणे पुरेसे नसून गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच भावी पिढीवर राष्ट्रभक्तीचे आणि उत्तम मूल्यांचे संस्कार रुजवणे गरजेचे आहे.गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातही...

अजब लाचेची गजब कहाणी..! दोन्ही हातांच्या दहा बोटांचा इशारा करून मागितली १० हजाराची लाच.. – पोलीस उपनिरीक्षक व पोलीस अंमलदार एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  छत्रपती संभाजीनगर :-राज्याच्या विविध भागात सरळ-सरळ तोंडी बोलणी करून अनेकजण लाच घेतांना व एसीबीच्या जाळ्यात अडकतांना दिसून येतात.पण, नुकतेच छत्रपती संभाजीनगर(पूर्वीचे औरंगाबाद)शहरात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!