- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नंदुरबार :-नंदुरबार जिल्हा हा आदिवासी,बहुल जिल्हा म्हणून ओळखला जातो.जिल्हा सातपुड्याच्या पायथ्याशी असल्याने आजही जिल्ह्यातील अनेक गाव-पाड्यांपर्यंत पोहचण्यासाठी रस्ता नाही.यात वाहन जाणे तर दूरच,दरम्यान रस्ता नसल्याने पायपीट करतच रुग्णालय गाठावे लागते.गरोदर महिलांना कित्तेकदा बांबूची झोळी करूनच न्यावे लागत असते.असाच प्रकार आज,सोमवारी १८ नोव्हेंबरला उघडकीस आला असून यात महिलेचा रस्त्यातच गर्भपात झाल्याचा प्रकार घडला आहे.
विधानसभेत कोट्यावधीच्या विकासाच्या गोष्टी सत्ताधारी आणि विरोधकांकडून केल्या जातात.मात्र,आज रस्ता नसल्याने नंदुरबार जिल्ह्यातल्या अक्कलकुवा तालुक्यातील पिंपळखुटा गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या वेहगीच्या बारीपाडा मधल्या एका गर्भवती महिलेचा रस्त्यातच गर्भापत झाल्याची घटना समोर आली आहे.रस्ता नसल्याने या महिलेला साडेआठ किलोमीटर बांबुची झोळी करुन मुख्य रस्त्यावर नेले जात होते.रुग्णवाहीका नसल्याने खाजगी गाडीतून पिपंळखुटाच्या रुग्णालायत नेले जात होते. दरम्यान,रस्त्यातच गाडी पाण्यातील चिखलात फसली. त्यामुळे गाडी बाहेर काढण्यासाठी बराच वेळ गेला. परिणामी,रस्त्यातच महिलेचा पाच महिन्याचा गर्भपात झाला.यानंतर तिला पिपंळखुटा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.सध्या स्थितीत महिलेची प्रकृती बरी आहे.पाड्याला ग्रामपंचायत मातीचा रस्ता करुन देते.मात्र, पावसाळ्यात हा रस्ता वाहून जात असल्याने पावसाळा आणि हिवाळ्यात रस्त्याअभावी जीवघेणा प्रवास महिलांना करावा लागतो आहे.
- Advertisement -

