Monday, August 24, 2026
Homeगडचिरोलीमराठी भाषेचा अभिमान प्रत्येकाने बाळगावा- न्यायाधीश वसंत कुलकर्णी

मराठी भाषेचा अभिमान प्रत्येकाने बाळगावा- न्यायाधीश वसंत कुलकर्णी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-मराठी भाषा ही संत ज्ञानेश्वर,तुकाराम आणि समर्थ रामदास यांची भाषा असून तिचा अभिमान प्रत्येकाने बाळगावा,असे प्रतिपादन गडचिरोली जिल्हा न्यायालयात आयोजित “मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा” निमित्त प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वसंत भा.कुलकर्णी यांनी केले.गडचिरोली जिल्हा न्यायालयाच्या कक्ष क्रमांक-३०६ मध्ये या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.न्या.कुलकर्णी यांनी अध्यक्षस्थान भूषविले,तर गोंडवाना विद्यापीठातील मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.निलकंठ पंढरी नरवाडे हे प्रमुख पाहुणे व मुख्य वक्ते म्हणून उपस्थित होते.जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर.आर.पाटील यांचीही विशेष उपस्थिती होती.कार्यक्रमात मुख्य न्यायिक दंडाधिकारी एस.पी.सदाफळे,दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर), सी.पी.रघुवंशी,सह-दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर)भैसारे आणि इतर न्यायाधीश मंडळींनी आपली उपस्थिती दर्शवली.कार्यक्रमाचे संचालन सह-दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) श्रीमती पठाण यांनी केले.प्रा.डॉ.नरवाडे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात मराठी भाषेचे न्यायालयीन कामकाजातील महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी प्रत्येक मराठी भाषिकाने आपल्या भाषेचा अभिमान बाळगण्याचे आवाहन केले.
यावेळी न्या.कुलकर्णी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मराठी भाषा समृद्ध,श्रेष्ठ आणि अभिजात असल्याचे स्पष्ट करत पु.ल.देशपांडे,वि.वा. शिरवाडकर,संत ज्ञानेश्वर व तुकाराम यांच्या कार्याचा उल्लेख केला.मराठी भाषा लोप पावण्याची भीती दूर करण्यासाठी तिचा रोजच्या जीवनात अधिकाधिक वापर व्हावा,असे त्यांनी आवर्जून सांगितले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अधिक्षक एस.जे.शेंडे यांनी परिश्रम घेतले.सह-दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) भैसारे यांनी आभार प्रदर्शन केले.या कार्यक्रमाला न्यायालयीन कर्मचारी तसेच वकील मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जोरदार पावसाचा फटका; वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता.. – वैनगंगा नदीकिनारी राहणाऱ्यांना सतर्क राहण्याचा सल्ला..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने धानासह अन्य खरीप पिकांच्या स्थितीबाबत शेतकऱ्यांची चिंता वाढली होती.अशा परिस्थितीत काल रविवारी झालेला पाऊस पिकांसाठी...

नैनपूरच्या विद्यार्थ्यांचा ‘सीमेवरील जवानांसाठी प्रेमाची राखी’ उपक्रम; जवानांना पाठवल्या राख्या..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा नैनपूर वार्ड येथे आज,सोमवार २४ ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, राष्ट्रनिष्ठा,सेवाभाव आणि सामाजिक बांधिलकीची भावना...

नालीच्या चेंबरवर मृतावस्थेत आढळला नवजात अर्भक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या कामठी तालुक्यातील कोराडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बोखारा गावातील रस्त्यालगत असलेल्या नालीच्या चेंबरवर नवजात बाळाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ...

‘ई-पीक पाहणी’ मोबाईल ॲपच्या कटकटीतून शेतकऱ्यांची सुटका; गावनिहाय नियुक्त सहाय्यकच घेणार नोंदी..

उद्रेक न्युज वृत्त :-शासनाने यंदाच्या 'खरीप हंगाम-२०२६' साठी ई-पीक पाहणीच्या कार्यपद्धतीत  केलेला बदल शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे.यापुढे प्रत्येक शेतकऱ्याला स्वतः मोबाइलवरून ई-पीक पाहणी करण्याची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!