Friday, July 10, 2026
Homeसिंदेवाहीभीषण अपघातात मायलेकीसह चार जणांचा दुर्दैवी मृत्यू..

भीषण अपघातात मायलेकीसह चार जणांचा दुर्दैवी मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
प्रशांत गेडाम
सिंदेवाही(चंद्रपूर):-सिंदेवाही तालुक्यातील पवनाचक गावातील मजुरांवर तेलंगणा राज्यातील रामगुंडम परिसरात काळाने घाला घातल्याने चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला,तर तब्बल २७ मजूर गंभीर जखमी झालेत.या दुर्घटनेमुळे पवनाचक गावासह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यातील पवनाचक गावातील मजूर स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध नसल्याने दरवर्षीप्रमाणे यंदाही भात रोवणीच्या हंगामी कामासाठी तेलंगणा राज्यात गेले होते.सलग तीन दिवस त्यांनी शेतात भात रोवणीचे काम केले.काल गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास शेतातील कामे आटोपून ते राहत्या ठिकाणी परत जात असतांना रामगुंडम परिसरात त्यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला.अपघाताची भीषणता इतकी जोरदार होती की घटनास्थळीच चार मजुरांचा मृत्यू झाला,तर अनेकजण गंभीर जखमी झाले.या दुर्घटनेत अतुल वासुदेव सोनुले वय ४५ वर्षे,रा.पवनाचक, ता.सिंदेवाही,जि.चंद्रपूर,अर्चना जनार्धन सोनुले वय ४० वर्षे,रा.पवना चक,ता.सिंदेवाही, रंजना प्रभाकर शेंडे वय ५० वर्षे,रा.पवना चक, ता.सिंदेवाही आणि प्रभा सिताराम मोहुर्ले वय ५६ वर्षे,रा.वाढोना,ता. नागभीड,जि.चंद्रपूर अशी मृतांची नावे आहेत.तर जखमी २७ मजुरांना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून,काहींची प्रकृती चिंताजनक आहे.या दुर्घटनेतील सर्वाधिक हृदयद्रावक बाब म्हणजे अर्चना जनार्धन सोनूले आणि प्रभा सीताराम मोहुर्ले या मायलेकींचा एकाच अपघातात मृत्यू झाला.या घटनेमुळे दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसर शोकमग्न झाला आहे.
ग्रामीण भागात पुरेसा रोजगार उपलब्ध नसल्याने अनेक कष्टकरी मजुरांना उदरनिर्वाहासाठी परराज्यात जावे लागते.मात्र,प्रवासात होणारे अपघात अनेक कुटुंबांचे आयुष्य उद्ध्वस्त करत आहेत.भाकरीच्या शोधात घरापासून दूर गेलेल्या मजुरांचा अशा प्रकारे दुर्दैवी मृत्यू होणे ही अत्यंत वेदनादायी बाब असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.सिंदेवाही तालुक्यात यापूर्वी वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांतही अनेकांनी जीव गमावला आहे.आता रोजगारासाठी परराज्यात गेलेल्या मजुरांच्या अपघाती मृत्यूने ग्रामीण भागातील रोजगार,सुरक्षित प्रवास आणि मजुरांच्या संरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शासनाने ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीला प्राधान्य देऊन अशा दुर्घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात,अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाघाचा हल्ला; ३० वर्षीय तरुण जिवानिशी गेला..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-एका ३० वर्षीय तरुणाचा वाघाच्या हल्ल्यात जीव गेल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रम्हपुरी वन विभागातील पद्मापूर चक जंगल परिसरालगत असलेल्या कुरण गट...

‘कृषी पायाभूत सुविधा निधी’ योजनेअंतर्गत दोन कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जावर ३ टक्के व्याज सवलत.. – शेतकरी,एफपीओ,सहकारी संस्था व कृषी उद्योजकांनी लाभ घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतमालाचे मूल्यवर्धन,सुरक्षित साठवणूक, प्रक्रिया उद्योग आणि आधुनिक विपणन व्यवस्था सक्षम करण्यासाठी केंद्र शासनाच्या 'कृषी पायाभूत सुविधा निधी' योजनेअंतर्गत आकर्षक आर्थिक सहाय्य...

गडचिरोली वनपरिक्षेत्रात रानटी हत्तींचा वावर.. – रील आणि फोटोंच्या नादात जीव धोक्यात घालू नका-उपवनसंरक्षक गडचिरोली

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गेल्या काही दिवसांपासून गडचिरोली वनविभागात,विशेषतः गडचिरोली वनपरिक्षेत्रात रानटी हत्तींचा वावर आहे.मनुष्य आणि हत्ती यांच्यात कोणताही अनुचित प्रकार किंवा संघर्ष होऊ नये,यासाठी...

संशय आल्याने दहा हजार घेण्यास नकार; पण तरीही गुन्हा दाखल.. -पोलीस हवालदारावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-दाखल गुन्ह्यातील गुन्ह्याचे स्वरूप कमी करून तपासात मदत करण्याच्या नावाखाली दहा हजार रुपयांची लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविणाऱ्या एका पोलीस हवालदारावर भंडारा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!