Friday, July 31, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तभविष्यात शिक्षक भरती होण्याची शक्यता कमी..!

भविष्यात शिक्षक भरती होण्याची शक्यता कमी..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-अगोदरच महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यात शिक्षकांची कमतरता आहे.अश्यातच सुधारित संचमान्यता निकषानुसार अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्याचे आदेश शासनाने दिल्याने नव्या संचमान्यता निकषामुळे राज्यात हजारो शिक्षक पदे कमी होणार आहेत.यामुळे राज्यातील डोंगराळ,दुर्गम, आदिवासी व नक्षलग्रस्त भागांतील कमी पटांच्या शाळांना याचा मोठा फटका बसणार आहे.यात गडचिरोली,अमरावती व डोंगरी-दुर्गम,आदिवासी भाग असलेल्या जिल्ह्यात याचा मोठा फटका बसणार आहे. विशेष म्हणजे,अतिरिक्त होणाऱ्या शिक्षकांचे रिक्त जागी समायोजन करण्यात येणार आहे; पण,शिक्षक पदे कमी झाल्याने भविष्यात शिक्षक भरती होण्याची शक्यता कमी आहे.२३ ऑक्टोंबर २०२५ रोजी शाळेच्या पटावर नोंद असलेल्या आधार वैध विद्यार्थी संख्येनुसार शासनाने २०२५-२६ ची संचमान्यता अंतिम केली आहे.१५ मार्च २०२४ रोजीच्या संच मान्यतेच्या सुधारित आदेशानुसार अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांचे समायोजन तीन मार्चपर्यंत जिल्हास्तरावर,२५ मार्चपर्यंत विभागस्तर आणि ३१ मार्चपर्यंत राज्यस्तरावर करण्याचे आदेश राज्याच्या प्राथमिक, माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण संचालकांनी दिल्याने राज्यातील अनेक जिल्ह्यातील शाळांना  मोठा फटका बसणार आहे.
  • विजय कोंबे,राज्याध्यक्ष,प्राथमिक शिक्षक समिती👇
शिक्षण कायद्यानुसार शाळात शिक्षक पदे मंजूर करणे आवश्यक आहे.मात्र,महाराष्ट्र शासनाने त्यामध्ये बदल करून संचमान्यतेचे नवीन निकष आणले आहेत.त्याचा फटका ग्रामीण भागातील शाळांना बसणार आहे. शाळांच्या पटाऐवजी मुलांच्या शिक्षणाला प्राधान्य देणे आवश्यक आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जिल्हा परिषदांसह मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बार एकाचवेळी होण्याची शक्यता..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील ५० टक्के ओबीसी आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या तब्बल २२ जिल्हा परिषदांच्या निवडणूका अद्यापही रखडल्या आहेत.विशेष म्हणजे,ज्या ठिकाणी मर्यादा ओलांडल्या गेल्या...

बांधकाम कामगारांनो सावधान..! योजनांच्या नावाखाली कुणालाही पैसे देऊ नका- न्यू ह्यूमन राईट अँड फाईट रिसर्च फाउंडेशनचे आवाहन

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांच्या नावाखाली काही ठिकाणी एजंट,दलाल,मध्यस्थ किंवा इतर व्यक्तींमार्फत बांधकाम...

पुराचा तडाखा; तब्बल ७०० नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टी व पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा प्रशासनाशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला.यावेळी जिल्हाधिकारी...

रेल्वेच्या धडकेत दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-रेल्वेच्या धडकेत दोन सख्ख्या भावांचा  दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागपूर जिल्ह्याच्या सावनेर तालुक्यातील मालेगाव टाऊन परिसरात आज,गुरुवार ३० जुलै रोजी सकाळच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!