Tuesday, June 23, 2026
Homeसिरोंचानाल्यातील गढूळ पाण्यावर भागविली जाते तहान -सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर येथे पाण्याची समस्या

नाल्यातील गढूळ पाण्यावर भागविली जाते तहान -सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर येथे पाण्याची समस्या

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

सिरोंचा :- तालुक्यातील झिंगानूर चेक नंबर १ झिंगानूर चेक नं.२ येथील नागरिक ऐन हिवाळ्यात पाण्यासाठी वणवण करीत असून गावजवळूनच वाहणाऱ्या नाल्यात खड्डा करून पाणी आणून नाल्यातील गढूळ पाणी पिण्यासाठी वापरत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर टांगला जात आहे.

गावात पाणी पुरवठा योजने अंतर्गत नळ योजना मंजूर करून बांधकाम करण्यात आले.मात्र दोन वर्षे लोटूनही पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आली नसल्याने वारंवार दरवर्षी गावांतील नागरिकांना पाणी टंचाईच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.दरवर्षी  नोव्हेंबर महिन्यापासून विहीरींना व हातपंपना पाणी येत नसल्याने गावातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असते.

शासन स्तरावरून करोडो रुपये खर्च करून नागरिकांसाठी पाणी पुरवठा योजना हाती घेण्यात येतात;मात्र प्रत्यक्षात अतिदुर्गम भागत पोहचविल्याच जात नसल्याने वा पोहचविन्यात येतात तर त्यावर अंमलबजावणी करण्यात येत नसल्याने अशा समस्यांना सामोरे जावे लागत आहे.पाणी पुरवठा योजना बांधकाम करून दोन वर्षे झाली तरी सुद्धा समस्यांवर तोडगा काढण्यात आला नसल्याने यावर पाणी टंचाईचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा अशी मागणी गावातील व परिसरातील नागरिकांनी केली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाकडून दखल.. – तीन प्रगतशील शेतकऱ्यांना ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील तीन प्रगतशील शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाने दखल घेत सन २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षांसाठीचा प्रतिष्ठेचा 'वसंतराव नाईक शेतीनिष्ठ...

कर्जमाफीसाठी शेतकरी थेट बैलावर बसून पोहचला तहसील कार्यालयात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राज्यातील शेतकरी बांधवांचे २ लाखापर्यंत कर्जमाफ करण्यात येणार आहे; पण शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेला नाही. कर्जमाफीबाबत प्रशासनाकडून वा संबंधित...

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-एसटी अर्थात राज्य परिवहन महामंडळाच्या  कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ५३ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची घोषणा आज,मंगळवार २३ जून रोजी...

नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी निर्धारित मुदतीत वार्षिक विवरणपत्र सादर करण्याचे आवाहन.. – अन्यथा दहा हजाराचा दंड..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ पिरिऑडिकल्स (पीआरपी)अधिनियम,२०२३ अंतर्गत नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी आर्थिक वर्ष २०२४-२५ चे लेखापरीक्षित वार्षिक विवरणपत्र प्रेस...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!