Thursday, July 16, 2026
Homeनागपूरतब्बल दीड वर्षांनी नोंदवली बलात्काराची तक्रार; न्यायालयाने खटलाच केला खारीज..

तब्बल दीड वर्षांनी नोंदवली बलात्काराची तक्रार; न्यायालयाने खटलाच केला खारीज..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-काही महिला सर्वकाही सुरळीत सुरू असतांनाच रागाच्या भरात अनेकांना कायद्याच्या कचाट्यात पकडुन वर्चस्व गाजविण्याचा प्रयत्न करू पाहतात आणि हल्ली अनेक पुरुषांच्या बाबतीत असे घडतांना दिसून येत आहे.मात्र,कायद्याची प्रभावी मांडणी आणि न्यायपालिकेला पटवून दिलेला युक्तिवाद हा कधीही निष्फळ ठरत नसतो.अश्याच प्रकारे एका विवाहित महिलेने तब्बल दीड वर्षांनी तिच्यावर झालेल्या बलात्काराची तक्रार पोलिसांत दाखल केली.त्यानुसार, पोलिसांनी आरोपीविरोधात एफआयआर(प्रथम खबरी अहवाल)नोंदवून प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी (जेएमएफसी)न्यायालयात खटला दाखल केला होता.प्रकरणी आरोपीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले आणि खटल्याची बाजूच पलटली.ज्ञानेश्वर देवराव साबळे वय ४४ वर्षे, रा.समुद्रपूर,जि.वर्धा असे आरोपीचे नाव असून आरोपीने ५ मे २०२३ रोजी बलात्कार करून ठार मारण्याच धमकी दिली, अशी तक्रार महिलेने २८ डिसेंबर २०२४ रोजी केली होती.त्यावरून गिरड पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.अश्यातच आरोपीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात न्यायाची मागणी केली.आरोपीतर्फे ॲड.एस.ओ.अहमद यांनी बाजू मांडली आणि महिलेने केलेल्या आरोपाचे खंडन केले.परिणामी,तक्रारीवर संशय उत्पन्न झाल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील न्यायमूर्ती ऊर्मिला जोशी-फलके यांनी वादग्रस्त एफआयआर व खटला रद्द केला.विशेष म्हणजे, महिलेने तिच्यावरील बलात्काराची तक्रार करण्यासाठी तब्बल दीड वर्ष विलंब केला.त्यातच,बलात्कारसारखे गंभीर प्रकरण असतांनाही विलंबाचे कोणतेही ठोस कारणही दिले नाही,तसेच माहिती देण्यात विसंगती आढळून आली.न्यायालयाच्या लक्षात येताच संपूर्ण खटलाच खारीज केला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दहावीत शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार; दोन आरोपी फरार..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या आर्वी तालुक्यात एक धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.दोन नराधमांनी इयत्ता दहावीत शिकणाऱ्या मुलीच्या असह्यतेचा गैरफायदा घेत पैश्याचे आमिष दाखवून वारंवार...

गुरुजींची डोकेदुखी वाढली; विविध जबाबदारीचे ओझे लादून गुणवत्तेची अपेक्षा.. -पाणी डोक्याच्यावर गेल्यास काय खाक गुणवत्ता वाढणार?

उद्रेक न्युज वृत्त :-हल्ली शिक्षकांची अवस्था "ना घर के ना घाट के" अश्या प्रकारची झाली आहे.एक काळ होता जेव्हा शिक्षकाच्या हातात खड्डू आणि पुस्तक...

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या निकषात सुधारणा..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ च्या निकषात सुधारणा करण्याचा निर्णय मुंबई येथे मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र...

अखेर प्रतीक्षा संपली; लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणींची अखेर प्रतीक्षा संपली असून मागील महिन्याच्या दीड हजाराची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे.जून महिना संपून जुलै...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!