Tuesday, July 7, 2026
Homeहिंगोलीचोर मठात शिरले,अंगठ्या चोरल्या; देवघरावर नजर पडताच म्हणाले...नको !

चोर मठात शिरले,अंगठ्या चोरल्या; देवघरावर नजर पडताच म्हणाले…नको !

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

हिंगोली :- शहरातील खटकाळी भागामध्ये खडेश्वरबाबा यांचा मठ आहे.या ठिकाणी महंत सुमेरपुरी महाराज मठाचे सर्व कामकाज पाहतात.नेहमीप्रमाणे सुमेरपुरी महाराज आरती व धार्मिक कार्यक्रम करून रात्री मठामध्ये असलेल्या खोलीत आराम करण्यासाठी गेले होते.रात्री अकरा ते साडेअकरा वाजण्याच्या सुमारास तीन चोरटे मठाच्या पाठीमागील भागातून आत आले.
मठात कोणीतरी आले आहे हे लक्षात घेऊन महंत सुमेरपुरी महाराज यांनी त्या तिघांना विचारणा केली.मात्र यावेळी त्यापैकी एकाने खंजीर काढून सुमेरपुरी महाराज यांना खोलीत घेऊन चलण्याबाबत दम दिला.अचानक घडलेल्या या प्रकारामुळे ते घाबरून गेले.चोरट्यांनी त्यांना धरून खोलीमध्ये नेले.यावेळी अन्य एका चोरट्याने त्यांच्या कानपट्टीवर पिस्तूल रोखून अलमारीची चावी मागितली. त्यांनी चावी देताच चोरट्यांनी अलमारी उघडून कपाटातील सोन्याच्या तीन ते चार अंगठ्या ताब्यात घेतल्या.यावेळी महंतांना मारहाण देखील केली.
खोलीतून निघालेल्या चोरट्यांचे खडेश्वर महाराजांच्या मूर्तीवरील चांदीच्या मुकुटाकडे लक्ष गेले.मात्र देवाचा मुकुट ‘नको’ असे एका चोरट्याने इतर दोघांना सांगितले.त्यानंतर तिघेही मुकुट न घेताच निघून गेले.मात्र जाताना चोरट्यांनी एकाजवळ असलेला मोबाईल देखील नेला.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाघांचे हल्ले काही केल्या थांबेना..! ऐन शेतीच्या हंगामातच वाघाने घेतला एकाचा जीव..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या चिमूर तालुक्यातील खडसंगी (बफर)वनपरिक्षेत्र व प्रादेशिक वनक्षेत्राच्या सीमेलगतच्या बरडघाट शेतशिवारात वाघाने एका ५० वर्षीय शेतकऱ्यावर हल्ला चढवून जीव घेतल्याची घटना...

कृषी विभागामार्फत खरीप हंगाम-२०२६ साठी पीकस्पर्धेचे आयोजन.. – स्पर्धेतील विजेत्यांना तालुका,जिल्हा आणि राज्यस्तरावर प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांकाची बक्षिसे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील अन्नधान्य,कडधान्य व गळीतधान्य पिकांची उत्पादकता वाढविणे,प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे तसेच आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने कृषी विभागामार्फत खरीप हंगाम...

उद्यापासून गडचिरोली,आरमोरी व देसाईगंज येथे जादूटोणा विरोधी कायदा व अंधश्रद्धा निर्मूलनावर प्रबोधन कार्यक्रम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जादूटोणा विरोधी कायदा तसेच अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत समाजामध्ये जनजागृती व प्रबोधन व्हावे,या उद्देशाने गडचिरोली जिल्ह्यात विशेष प्रबोधन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या...

संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात १५ दिवस मनाई आदेश लागू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ मधील कलम ३७(१)(३)अन्वये ५ जुलै २०२६ रोजी रात्री १२.०१ वाजल्यापासून ते १९...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!