- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-स्वयंपाकघरातील गॅस लिकेज असल्याने चहा बनवण्यासाठी गॅस पेटवणार तितक्याच आगीचा अचानकपणे भडका उडाला आणि काही क्षणातच सिलिंडरचा जोरदार स्फोट झाला.दरम्यान,संपूर्ण घरात आग पसरून घरातील जीवनावश्यक वस्तू सोन्याचे दागिने,टीव्ही,फ्रीज,कपडे यांसह सर्व साहित्य जळून खाक झाले.आग लागल्यानंतर घरातील सर्वजण सैरावैरा पळू लागले.यात अतुल दशरथ पानतावणे वय ४० वर्षे यांचा मृत्यू झाला,तर आग विझवत असतांना अतुल यांची पत्नी नम्रता,आई शांता,मोठा भाऊ नितीन पानतावणे वय ५० वर्षे,मजवा भाऊ विनय पानतावणे वय ४८ वर्षे आणि अतुल यांची तीन मुले होरपळल्याने या सर्वांवर कामठी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.सदरची घटना आज,रविवार १९ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास नागपूर जिल्ह्याच्या कामठी शहरातील गांधीनगर भाजी मंडी परिसरात घडली.आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली.तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते. याप्रकरणी जुनी कामठी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रशांत जुमडे आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक मनीष हिवरकर यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कामठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवला असून घटनेचा पुढील सखोल तपास सुरू करण्यात आला आहे.
- Advertisement -

