- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-निसर्ग शेतकऱ्यांवर किती कोपला आहे; हे आजपर्यंत उसंत घेतलेल्या पावसावरून दिसून येत आहे.ज्यावेळी शेतकऱ्यांच्या धानाची कापणी होऊन मळणी सुरू होती व धान घरी येऊ लागलेत,अश्यावेळी पावसाने जोरदार हजेरी लावत शेतकऱ्यांच्या तोंडातील घास हिरावला.काही शेतकऱ्यांच्या शेत बांधावरील कळपा भिजून अंकुर फुटले होते.कित्तेक शेतकऱ्यांच्या धानाची नासाडी झाली तर कित्तेक शेतकऱ्यांचे धान ओलेचिंब होऊन कमी भावात खासगी व्यापाऱ्यांना विकावे लागले.यामुळे शेतकऱ्यांचे नशीब किती फाटके म्हणावे लागेल.अश्यातच आता नागपूर प्रादेशिक हवामान खात्याने आज,सोमवार १६ जून ते २० जून पर्यंत पुढील पाच दिवस गडचिरोली,चंद्रपूर व वर्धा जिल्ह्यास पावसाचे यलो अलर्ट जारी केले आहे.तर उद्या, मंगळवार १७ जून ते २० जून पर्यंत चार दिवस गोंदिया,भंडारा आणि नागपूर या जिल्ह्यास पावसाचे यलो अलर्ट देण्यात आले आहे.तसेच पुढील पाच दिवसांत विदर्भाच्या कमाल तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.देण्यात आलेल्या यलो अलर्ट नुसार एक-दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याच्या वारा ४० ते ५० किमी प्रतितास वेगाने वाहण्याची शक्यता नागपूर हवामान केंद्राने वर्तवली आहे.
- Advertisement -

