- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेत पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.कष्टाने पेरलेली पिके पावसाच्या तडाख्यामुळे जमिनीवर कोलमडून पडली आहेत.आधीच उत्पन्न कमी तर उत्पादन खर्च जास्त असतांनाच नैसर्गिक संकटाने भर घालून शेतकऱ्यांची भाकरी मुखातून हिरावून घेतली असल्याने आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करून दिवाळीपूर्वी नुकसानभरपाई मिळावी,यासाठी स्थानिक महसूल प्रशासनासह जिल्हा प्रशासनास निर्देश दिले आहेत.गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी छातीला माती लावून शेती कसतो आहे.पैश्याची जुळवाजुळव करून धानपीकांसाठी राबतो आहे; अश्यातच अस्मानी संकट हे शेतकऱ्यांच्याच नशिबी कां? सततची नापिकी,किडीचा प्रादुर्भाव,लहरी पाऊस कधी पडतो तर कधी एकही थेंब पडत नाही.त्यातच बरसला तर सर्वकाही उद्ध्वस्त करून सोडत असतो.त्यामुळे शासनाने तात्काळ मदतीचा हात पुढे करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा,असेही आमदार मसराम म्हणाले.महसूल प्रशासनाला दिलेल्या सूचनांनुसार लवकरच सर्व बाधित शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करून पंचनामे पूर्ण करण्यात येणार आहेत.
- आमदार रामदास मसराम👇
शेतकऱ्यांच्या पिकांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शासनाने त्वरित मदतीचा हात पुढे करणे आवश्यक आहे.प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत भरपाईची मदत पोहोचली पाहिजे.यासाठी झालेल्या पंचनाम्यांची यादी पारदर्शक पद्धतीने प्रकाशित करावी,जेणेकरून कोणताही शेतकरी नुकसानभरपाई पासून वंचित राहणार नाही.
- Advertisement -

