- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका केव्हा जाहीर होणार,याकडे सर्वांच्या नजरा भिडल्या होत्या.अशातच आता आज,मंगळवारी १५ ऑक्टोंबरला मुख्य निवडणूक आयुक्त यांनी दिल्लीत पत्र परिषद घेत माहिती दिली.महाराष्ट्र राज्यात एकाच टप्प्यात निवडणुका होणार असून यासाठी तारीख जाहीर करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात २० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुका होणार असून २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.यामुळे आता राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे.त्यामुळे राज्य सरकारला कोणतेही निर्णय आचारसंहितेच्या काळात घेता येणार नाहीत.
महाराष्ट्रात विधानसभेच्या २८८ जागांसाठी निवडणुकीचे बिगूल वाजले आहे.
राज्यातील सध्याच्या राजकीय समीकरणाबाबत बोलायचे झाले तर,यावेळी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीत पक्षफुटीमुळे दोन गट निर्माण झाले आहे.याचा या निवडणुकीवर मोठा परिणाम होणार आहे.दरम्यान या सगळ्यात आता दोन्ही युतींमध्ये जागावाटपावरून वाद आणि मतभेद होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
- Advertisement -

