- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-आरोग्य विभागाने राज्यभरातील चिकनगुनियाची आकडेवारी जाहीर केली.यात नागपूर शहरात सर्वाधिक रुग्ण असून,मुंबई शहर दुसऱ्या क्रमांकावर आहे,तर जिल्ह्यात कोल्हापूर प्रथम स्थानी, तर पुणे दुसऱ्या क्रमांकावर आहे.राज्यात १ जानेवारी ते ७ सप्टेंबरपर्यंत २ हजार ६४३ रुग्णांची नोंद झाली आहे.
एक डास माणसाची किती दाणादाण उडवतो आणि व्यवस्था कोलमडून टाकतो,याचा अनुभव चिकुनगुनियाच्या वाढत्या रुग्णसंख्येवरून दिसून येत आहे.या आजारात स्नायू व सांधेदुखीसोबतच चेहरा काळवंडणे,जांघेत,काखेत अल्सरमुळे रुग्ण हैराण
होत आहेत.आरोग्य विभागाने उपलब्ध करून दिलेल्या आकडेवारीनुसार राज्यात २०२३ मध्ये ग्रामीण भागात १ हजार ३८,तर शहरी भागात ६६४, असे एकूण १ हजार ७०२ रुग्णांची नोंद झाली होती.
यावर्षी ७ सप्टेंबरपर्यंत ग्रामीण भागात १ हजार १९१, तर शहरी भागात १ हजार ४५२,असे एकूण २ हजार ६४३ रुग्णांची नोंद झाली.मागील वर्षीच्या तुलनेत दुपटीने रुग्ण वाढले आहेत.
चिकनगुनिया संवेदनशील शहरात नागपूर अव्वल स्थानी आहे.७ सप्टेंबरपर्यंत ५७४ रुग्णांची नोंद झाली. त्याखालोखाल मुंबई शहरात २५६,कोल्हापूरमध्ये १५४,पुण्यात १५१,अकोल्यात ८८,सांगलीत ८४, अमरावतीत ४२,नाशिकमध्ये ४०,लातूरमध्ये २७,तर पिंपरी-चिंचवडमध्ये २२ रुग्ण आढळून आले आहेत.
२०२३ मध्ये शहराच्या तुलनेत ग्रामीणमध्ये चिकनगुनियाचे रुग्ण अधिक होते; परंतु २०२४ मध्ये ग्रामीणच्या तुलनेत शहरात रुग्णांची संख्या वाढताना दिसून येत आहे. या वर्षी कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक २०६, पुण्यात १६९, अमरावतीत १२३, अकोल्यात १०२, बीडमध्ये ८९,पालघरमध्ये ८२, गोंदियामध्ये ६८,सांगलीमध्ये ६६,नागपूरमध्ये ५७, तर वाशिममध्ये ५२ रुग्णांची नोंद झाली आहे.
- Advertisement -

