- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :- ‘निवडणुकीत एक गाणं तयार केलं.त्या
गाण्याच्या रॉयल्टी म्हणून ८५ हजार रुपये मिळाले. चांगलं काम करा. काम केल्यानंतर कोणालाच कळलं नाही पाहिजे, असं केंद्रीय नितीन गडकरी म्हणाले.ते नागपुरातील एका कार्यक्रमात बोलत होते.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरातील सुरेश भट सभागृहात अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या उद्घाटनाला हजेरी लावली.यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उपस्थितांशी बोलताना राजकारण्यांचे कान टोचले. नितीन गडकरी म्हणाले, ‘राजकारणी जसे बोलतो, तसे करत नाही.त्यामुळे गेल्या काही वर्षात राजकीय नेत्यांबद्दलची विश्वसनीयता कमी होत चालली आहे. लोकांना मूर्ख बनविणे सोपे आहे असं वाटतं.काही तर समाजाला अनेक प्रकारे तोडण्यासाठी प्रयत्न करत आहेत’.लोकसभा निवडणुकीच्यावेळी प्रचार बोललो, जातपात पाळत नाही.मला मत द्या किंवा नका देऊ.जो म्हणणार जात,त्याला बसणार लाथ असंही बोललो. चक्रधर स्वामी यांनी हाच संदेश दिला.समाजात अज्ञान अंधश्रद्धा,असमानता,स्त्री पुरुष विषमता हा भेद संपला पाहिजे. हाच संदेश घेऊन आपण जनतेच प्रबोधन केलं पाहिजे; असे ते म्हणाले.पैसा हे साधन आहे; पण साध्य नाही.माझा निवडणुकीमध्ये कोणीतरी गाणे तयार केले.ते गाणे युट्यूबवर टाकले.ते गाणे ९० लाख लोकांनी ऐकले. त्या गाण्यापोटी रॉयल्टी म्हणून ८५ हजार रुपये मला आणून दिले.चांगलं काम करा,आशीर्वाद पाठीशी आहे. काम केल्यानंतर कोणालाच कळलं नाही पाहिजे,पण आजकाल १० रुपये देऊन चौकात १० फोटो लावणारे आहेत; असे म्हणत टोला हाणला.
- Advertisement -

