Thursday, July 16, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तगुरुजींची डोकेदुखी वाढली; विविध जबाबदारीचे ओझे लादून गुणवत्तेची अपेक्षा.. -पाणी डोक्याच्यावर गेल्यास...

गुरुजींची डोकेदुखी वाढली; विविध जबाबदारीचे ओझे लादून गुणवत्तेची अपेक्षा.. -पाणी डोक्याच्यावर गेल्यास काय खाक गुणवत्ता वाढणार?

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-हल्ली शिक्षकांची अवस्था “ना घर के ना घाट के” अश्या प्रकारची झाली आहे.एक काळ होता जेव्हा शिक्षकाच्या हातात खड्डू आणि पुस्तक असायचे. पण,आता वर्गात विद्यार्थ्यांना शैक्षणिक धडे देण्यापेक्षा सकाळपासून संध्याकाळपर्यंत बीएलओची मतदारयादी, एसआयआर,यू-डाएस प्लस,जनगणना,विविध सर्वेक्षण, शिष्यवृत्ती,पोषण आहाराचा हिशोब व इतर विविध जबाबदारीचे ओझे लादण्यात आल्याने शिक्षकांकडून गुणवत्तेची अपेक्षा केली जाते.तेही मनुष्य प्राणीच आहेत.डोक्याच्यावर पाणी गेल्यास काय खाक गुणवत्ता वाढणार.एकीकडे मोठा गाजावाजा करून शाळा प्रवेशोत्सव करायचा आणि विद्यार्थी गुणवत्तेची बोंबाबोंब करून शिक्षणाचे ढोल पिटायचे.गुणवत्ता वाढवणाऱ्या शिक्षकाला वर्गात शिकवू तर द्या नं..! अशी म्हणण्याची वेळ आली आहे.सध्या स्थितीत शिक्षक एकंदरीत शिकविण्यापेक्षा इतर कारकुनी कामात अडकले आहेत. अश्यातच सतत मोबाइलवर तात्काळ माहिती देण्याचा संदेश येतो,अनेकदा सर्व्हर डाऊन असतो,शाळेत नेटवर्क मिळत नाही.डेटा वेळेवर गेला नाही की गुणवत्ता ढासळली म्हणून जाब विचारला जातो.शिक्षकांना एसआयआरचे काम करण्यासाठी आधी सकाळी साडे आठ ते अडीच वाजे शाळांची वेळ करण्यात आली. आता १५ ते २९ जुलैदरम्यान सकाळी साडे सात ते साडे बारा वाजेची वेळ बदलली,मात्र शिक्षकाकडून बीएलओ कामे कमी न करता ‘जैसे थे’ ठेवले आहे.त्यामुळे केवळ शाळांची वेळ बदलून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढणार कां? असा प्रश्न निर्माण झाला आहे.त्यातच,एसीच्या केबिनमध्ये बसून गुणवत्तेचे धोरण ठरवणाऱ्यांना मैदानावरचा शिक्षक किती तारेवरची कसरत करतोय हे दिसणार तरी कधी?असा विचार अनेक शिक्षकांच्या मनात घर करून सोडतो आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दहावीत शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार; दोन आरोपी फरार..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या आर्वी तालुक्यात एक धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.दोन नराधमांनी इयत्ता दहावीत शिकणाऱ्या मुलीच्या असह्यतेचा गैरफायदा घेत पैश्याचे आमिष दाखवून वारंवार...

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या निकषात सुधारणा..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ च्या निकषात सुधारणा करण्याचा निर्णय मुंबई येथे मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र...

अखेर प्रतीक्षा संपली; लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणींची अखेर प्रतीक्षा संपली असून मागील महिन्याच्या दीड हजाराची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे.जून महिना संपून जुलै...

बांधकाम कामगारांसाठी मोठा निर्णय; कामगारांना मिळणाऱ्या लाभ रकमेत वाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने बांधकाम कामगारांसाठी मोठा आणि महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. मंडळाच्या चार प्रमुख कल्याणकारी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!