उद्रेक न्युज वृत्त :-महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे नाव आता “विकसित भारत रोजगार आजिविका मिशन ग्रामीण” असे करण्यात आले असून आता ग्रामीण भागातील कुटुंबांना वर्षातून १२५ दिवस रोजगार मिळणार आहे.विशेष म्हणजे, योजनेचा केंद्रबिंदू ग्रामीण परिसर असल्याने कामांचे नियोजन,देखरेख आणि सनियंत्रणाची संपूर्ण जबाबदारी ग्रामपंचायतींकडे सोपवण्यात आली आहे. रोजगार हमी योजनेचा पंचायत समिती स्तरावर स्वतंत्र विभाग कार्यरत असून २५ लक्ष रुपयांपर्यंतच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्याचे अधिकार बीडीओंना देण्यात आले आहेत.तर अकुशल आणि कुशल कामांचे प्रमाण ६० आणि ४० च्या रेशोमध्ये असणे बंधनकारक आहे.अश्यातच केंद्र शासनाच्या निर्देशानुसार रोजगार हमी योजनेच्या अकुशल मजुरांच्या मजुरीत पाच रुपयांची वाढ करण्यात आली आहे.या निर्णयामुळे आता मजुरांना प्रतिदिन ३१२ रुपयांऐवजी ३१७ रुपये मजुरी मिळणार आहे. सदरची दरवाढ ही १ जुलैपासून महाराष्ट्रभर राज्यभर लागू झाली आहे.पण, एकीकडे जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती गगनाला भिडलेल्या असतांना मजुरीच्या दरात झालेली अल्प वाढ ही मजुरांची थट्टा करणारी असल्याची भावना व्यक्त होत आहे.याव्यतिरिक्त मोजमापानुसार मजुरी मिळत नसल्यामुळे मजुरांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. कामाच्या तुलनेत मिळणारी मजुरी अपुरी वाटत असल्याने अनेक मजूर आता या योजनेच्या कामापासून दूर जाणे पसंत करीत असल्याचे चित्र ग्रामीण भागात निर्माण झाले आहे.
आता रोजगार हमीच्या मजुरांना मिळणार प्रतिदिन ३१७ रुपये मजुरी..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

