उद्रेक न्युज वृत्त :-सिलिंडरच्या वाढत्या किमतींमुळे ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांनी गॅस वापरणे बंद करून पुन्हा एकदा पारंपरिक चुलीकडे वळण्यास सुरुवात केली आहे.सिलेंडर घ्यायचा की मुलांच्या शाळेची फी भरायची? घरगुती गॅस सिलिंडरच्या सतत वाढणाऱ्या किंमतींमुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे.गत अवघ्या सहा महिन्यांत सिलिंडरच्या दरात तब्बल दोनशे रुपयांची वाढ झाली असून,आता विनाअनुदानित सिलिंडरचा भाव एक हजार रुपयांच्या पार गेला आहे.महिन्याला हजार रुपये फक्त गॅसवर गेले तर दूध,भाजीपाला,औषध यासाठी पैसे कुठून आणायचे?असा सवाल नागरिक करत आहेत.परिस्थिती एवढी बिकट झाली आहे की, ग्रामीण भागात पुन्हा एकदा सरपण आणि लाकडे गोळा करणाऱ्या महिलांची संख्या वाढू लागली आहे.घरगुती सिलिंडर सोबतच व्यावसायिक सिलिंडरचे दरही गगनाला भिडले आहेत.त्यामुळे हॉटेल, चहाच्या टपऱ्या आणि लहान खाद्यपदार्थ विक्रेत्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे.आधीच तेल महाग,त्यात आता गॅसही महाग झाला.अशा परिस्थितीत आम्ही धंदा कसा करायचा आणि ग्राहकांना कोणत्या दराने खाद्य पदार्थ विकायचे?अशी हतबलता विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे.केंद्र सरकारने गरिबांना धूरमुक्त आयुष्य देण्यासाठी ‘उज्ज्वला योजना’ आणली.परंतु,सिलिंडर रिफिल करण्याची ऐपत नसल्याने अनेक लाभार्थ्यांचे सिलिंडर आज घराच्या कोपऱ्यात धूळखात पडले आहेत.या वाढत्या महागाईवर सरकारने लवकरात-लवकर नियंत्रण आणावे,अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे
गॅस सिलेंडर घ्यायचा की मुलांच्या शाळेची फी भरायची?
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

