Sunday, June 21, 2026
Homeमुंबईउद्यापासून पावसाळी अधिवेशनास सुरुवात; सत्ताधारी आणि विरोधक येणार आमनेसामने..

उद्यापासून पावसाळी अधिवेशनास सुरुवात; सत्ताधारी आणि विरोधक येणार आमनेसामने..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन हे उद्या,सोमवार २२ जून २०२६ पासून सुरू होणार आहे. सदरचे अधिवेशन तब्बल तीन आठवडे चालणार असून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याची चिन्हे आहेत.विशेष म्हणजे,२२ जून ते १० जुलै या कालावधीत मुंबईत होणारे अधिवेशन वाढती महागाई,शेतकरी कर्जमाफीतील जाचक अटी-शर्ती, वाढती गुन्हेगारी,अनुसूचित जातीचे उपवर्गिकरण,तीव्र पाणीटंचाईसह अनेक महत्त्वाच्या विषयांवरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने येण्याची शक्यता आहे. त्यातच,अद्याप विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेत्याची निवड झालेली नाही.त्यामुळे पावसाळी अधिवेशनही विरोधी पक्षनेत्याविना होणार अशी चिन्हे दिसत आहेत.राज्य सरकारने काही धरणांतील उपलब्ध पाणी ३१ ऑगस्टपर्यंत प्रामुख्याने पिण्यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर शेतीसाठी सोडले जाणारे पाणीही काही ठिकाणी बंद करण्यात आले आहेत.शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने एकीकडे पाळली जात नाहीत,तर दुसरीकडे पाणी मिळत नाही हा मुद्दा पेटणार आहे.यातच राज्यात सत्ताधाऱ्यांकडून सुरू असलेले पळवापळवीचे राजकारण तापण्याची शक्यता अधिक आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बापरे..! एका हाताने धुंडा असलेल्या व्यक्तीने २८ वर्षीय तरुणाचा भरझोपेतच केला खून..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-काही वर्षांपूर्वी विजेच्या धक्क्याने खांद्यापासून डावा हात गमावलेल्या एका ५५ वर्षीय धुंडा व्यक्तीने पैश्याच्या वादातून २८ वर्षीय तरुणाचा भरझोपेतच कुऱ्हाडीने वार...

अखेर शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा..

उद्रेक न्युज वृत्त :-प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या २३ व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या तोंडावर मोठा दिलासा मिळाला आहे.महाराष्ट्र राज्यातील तब्बल...

माहिती अधिकार कायद्यातील बदलांवर नाराजी; अण्णा उतरणार मैदानात.. – माहिती न देणाऱ्या चोरट्यांचे काय?

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य सरकारने गेल्या आठवड्यात एक राजपत्र काढून माहिती अधिकार कायद्यात काही महत्त्वाचे बदल केले आहेत.शासनाने १२ जून २०२६ रोजी माहिती...

खतरनाक कारनामा..! नीट परीक्षेच्या विद्यार्थ्याला चक्क परदेशातील दिले परीक्षा केंद्र..

उद्रेक न्युज वृत्त नागपूर :-काही कालावधीपासून पेपरफुटी तसेच शिक्षणाच्या आयचा घो होत असल्याने होतकरू विद्यार्थ्यांचे उज्वल भवितव्य धोक्यात येऊ लागले आहे.पालक वर्ग आपली मुले शिकून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!