- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :-महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन हे उद्या,सोमवार २२ जून २०२६ पासून सुरू होणार आहे. सदरचे अधिवेशन तब्बल तीन आठवडे चालणार असून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याची चिन्हे आहेत.विशेष म्हणजे,२२ जून ते १० जुलै या कालावधीत मुंबईत होणारे अधिवेशन वाढती महागाई,शेतकरी कर्जमाफीतील जाचक अटी-शर्ती, वाढती गुन्हेगारी,अनुसूचित जातीचे उपवर्गिकरण,तीव्र पाणीटंचाईसह अनेक महत्त्वाच्या विषयांवरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने येण्याची शक्यता आहे. त्यातच,अद्याप विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेत्याची निवड झालेली नाही.त्यामुळे पावसाळी अधिवेशनही विरोधी पक्षनेत्याविना होणार अशी चिन्हे दिसत आहेत.राज्य सरकारने काही धरणांतील उपलब्ध पाणी ३१ ऑगस्टपर्यंत प्रामुख्याने पिण्यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर शेतीसाठी सोडले जाणारे पाणीही काही ठिकाणी बंद करण्यात आले आहेत.शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने एकीकडे पाळली जात नाहीत,तर दुसरीकडे पाणी मिळत नाही हा मुद्दा पेटणार आहे.यातच राज्यात सत्ताधाऱ्यांकडून सुरू असलेले पळवापळवीचे राजकारण तापण्याची शक्यता अधिक आहे.
- Advertisement -

