- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-पावसाच्या प्रतीक्षेत असलेला बळीराजा एकीकडे हवामानाच्या अनिश्चिततेशी,
तर दुसरीकडे वाढत्या उत्पादन खर्चाशी सामना करत आहे.मृग नक्षत्राचा जवळपास पंधरा दिवसांचा कालावधी उलटूनही दमदार पाऊस झालेला नाही.बहुतांश शेतकऱ्यांनी मशागतीची कामे पूर्ण करून पेरणीची तयारी केली आहे.मात्र,जमिनीत पुरेसा ओलावा नसल्याने पिकांच्या पेरणीचा निर्णय लांबणीवर पडला आहे. सध्याच्या स्थितीत घाईने पेरणी केल्यास दुबार पेरणीचा फटका बसण्याची शक्यता असल्याने शेतकरी संभ्रमात आहेत.तथापी खत आणि बियाण्यांच्या वाढत्या दरांमुळे शेतकऱ्यांवरील आर्थिक ताण अधिक वाढला आहे. आधीच वाढलेल्या शेती खर्चामुळे उत्पादनाचे गणित बिघडले असून कमी पावसाच्या शक्यतेच्या चर्चेमुळे शेतकरी अधिक चिंतेत आहेत.यंदाच्या तीव्र उष्णतेचा परिणाम जलस्रोतांवरही दिसून येत आहे.शेतशिवार
परिसरातील अनेक विहिरी आणि बोअरवेलची पाणीपातळी घटली असून पावसाचे आगमन आणखी उशिरा झाल्यास शेतीसोबतच पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. त्यामुळे भविष्याची चिंताही लागली असल्याचे चित्र आहे. विशेषतः १५ जून ते ३० जून हा खरीप पेरणीसाठी निर्णायक कालावधी मानला जातो.अश्यातच कृषी विभागाने शेतकऱ्यांना काही बाबींचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.ज्यात जमिनीत किमान तीन ते चार इंच ओलावा असल्याची खात्री करूनच पेरणी करावी, पावसाची सातत्यपूर्ण स्थिती निर्माण होईपर्यंत घाईघाईने पेरणी टाळावी,कमी कालावधीत येणाऱ्या व कमी पाण्यात तग धरणाऱ्या पर्यायी वाणांचा विचार करावा.
- Advertisement -

