उद्रेक न्युज वृत्त :-पूर्वी एकत्र कुटुंबातील सदस्यांच्या नावे जमिनीचे पोटहिस्से करण्यासाठी दोन हेक्टरपर्यंतच्या क्षेत्रासाठी मोजणी फी ही तीन हजार रुपये आकारली जायची,तर त्यापुढील क्षेत्रासाठी अतिरिक्त १ हजार रुपये शुल्क घेतले जायचे.मात्र,आता महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख विभागाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक निर्णय घेतला आहे. एकत्र कुटुंबातील जमिनींच्या पोटहिश्श्यांची मोजणी आता अवघ्या दोनशे रुपयांत केली जाणार आहे.या निर्णयामुळे शेतकऱ्यांचा मोजणीवर होणारा हजारो रुपयांचा खर्च वाचणार असून,जमिनीचे सातबारा आणि नकाशे अद्ययावत होण्यास मोठी मदत होणार आहे. जमाबंदी आयुक्त आणि भूमी अभिलेख राज्य संचालकांनी यासंदर्भातील अधिकृत आदेश जारी केले असून,त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हा कार्यालयांना देण्यात आले आहेत.विशेष म्हणजे,भूमी अभिलेख विभागाने केवळ शुल्कात कपात केली नसून, ही प्रक्रिया जलद करण्यासाठी कालमर्यादाही निश्चित केली आहे.जमीन पोटहिस्सा मोजणीचे अर्ज प्राप्त झाल्यापासून एक महिन्याच्या आत उपअधीक्षक,भूमी अभिलेख यांनी ही प्रकरणे निकाली काढणे बंधनकारक आहे.संमतीने केलेले पोटहिस्से आणि दिवाणी न्यायालयाच्या आदेशानुसार होणाऱ्या वाटप मोजणीसाठीही हीच सवलत लागू असेल.यामुळे मोजणीसाठी लागणारा आर्थिक भार कमी होऊन प्रकरणांची संख्या वाढण्यास मदत होईल.या सवलतीचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे काही महत्त्वाची कागदपत्रे असणे अनिवार्य आहे.यामध्ये कुटुंबातील सदस्यांच्या शेतजमिनीचा मुद्रांक शुल्क विभागाचा नोंदणीकृत वाटप दस्त किंवा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम ८५ नुसार तहसीलदारांनी दिलेला अधिकृत आदेश सादर करावा लागेल.या प्रक्रियेमुळे नकाशामध्ये जमिनीच्या हद्दी,क्षेत्र आणि चतुःसीमा यांच्या अचूक नोंदी वेळेत घेतल्या जातील, परिणामी भविष्यात होणारे हद्दींचे आणि क्षेत्राचे वाद मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे.
आता शेतकऱ्यांच्या जमिनींच्या मोजणीसाठी लागणार केवळ दोनशे रुपये..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

