- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-सोलापूर जिल्ह्याच्या पूर्वेस वसलेल्या धाराशिव जिल्ह्यातून काळजाला चटका लावणारी घटना आज सकाळच्या सुमारास उघडकीस आली.अवघ्या सहा महिन्यांपूर्वीच पोलीस उपनिरीक्षक(PSI)पदी पदोन्नती मिळालेले व राज्य उत्पादन शुल्क विभागात कार्यरत असलेले मोहन भीमा जाधव वय ५५ वर्षे,रा.सोलापूर यांचे आज,सोमवार २६ जानेवारी रोजी ध्वजारोहण समारंभादरम्यान अचानक आलेल्या हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.पदोन्नतीचा आनंद आणि नवी जबाबदारी पार पाडत असतांनाच त्यांच्यावर काळाने झडप घातल्याने अनेकांचे डोळे पाणावले आहेत.सदरची घटना धाराशिव जिल्ह्याच्या उमरगा तालुक्यातील तलमोड सीमा तपासणी नाक्यावर ध्वजारोहण समारंभ सुरू असतांनाच घडली.
आज सकाळच्या सुमारास संपूर्ण देशात प्रजासत्ताक दिनाचा उत्सव मोठ्या उत्साहात पार पाडला जात होता. अश्याच प्रकारे उमरगा तालुक्यातील तलमोड सीमा तपासणी नाक्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या सोहळ्यासाठी विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक मोहन जाधव गणवेशात सज्ज होऊन शिस्तबद्ध रांगेत उभे होते. कार्यक्रम सुरू असतांनाच जाधव यांना अचानकपणे भोवळ आली आणि ते थेट जमिनीवर कोसळले. जमिनीवर कोसळताच त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.बाजूलाच उपस्थित सहकाऱ्यांनी तातडीने त्यांना उमरगा येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले.मात्र,त्यांची प्राणज्योत आधीच मालवली होती. प्राथमिक तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.मृत्यूचे कारण हृदयविकाराचा तीव्र धक्का बसल्याने झाल्याचे स्पष्ट करण्यात आले.ऐन भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच दुःखद घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
- Advertisement -

