Thursday, September 10, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तअभिनेता धर्मेंद्र काळाच्या पडद्याआड; ८९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास..

अभिनेता धर्मेंद्र काळाच्या पडद्याआड; ८९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-बॉलीवूड मधील ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र देओल यांनी आज,सोमवार २४ नोव्हेंबरला  मुंबईतील त्यांच्या राहत्या घरी ८९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. प्रकृतीवस्थामुळे धर्मेंद्र यांना काही दिवसांपूर्वीच मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले होते व त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. अश्यातच आज सकाळच्या सुमारास त्यांची प्रकृती खालावल्याने निधन झाले.त्यांच्या निधनाने बॉलिवूडमध्ये कधीही भरुन न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. बॉलिवूडचा ‘ही-मॅन’ म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र गेल्या सहा दशकांहून अधिक काळ इंडस्ट्रीत कार्यरत आहेत.त्यांचा ‘इक्किस’ हा शेवटचा चित्रपट येत्या २५ डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.भारतीय सिनेसृष्टीतील महान अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र यांनी १९६० मध्ये ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या चित्रपटातून कारकिर्दीची सुरुवात केली. २०१२ मध्ये भारत सरकारकडून त्यांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.धर्मेंद्र यांनी दोन लग्न केले. त्यांचे पहिले लग्न प्रकाश कौर यांच्याशी झाले होते. त्यांच्यापासून त्यांना चार मुले आहेत.सनी देओल,बॉबी देओल,विजेता देओल आणि अजिता देओल.त्यांनी १९८० मध्ये त्यांच्या पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता हेमा मालिनीशी लग्न केले.धर्मेंद्र यांनी दुसऱ्या लग्नासाठी इस्लाम धर्म स्वीकारला होता.हेमा मालिनीपासून त्यांना दोन मुली ईशा देओल आणि अहाना देओल या आहेत. धर्मेंद्र यांच्या निधनाने देओल कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धरणात बुडालेल्या तरुण शेतकऱ्याचा सापडला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बैल पोळा सणाच्या एक दिवसापूर्वी धरण परिसरात बैल धुण्यासाठी गेलेला तरुण शेतकरी बुडाल्याची घटना काल,बुधवार ९ सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजेच्या...

सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन,वारसा हक्क,पदोन्नती व निवासाच्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करा- राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागरिकांचे आरोग्य आणि सार्वजनिक स्वच्छता राखण्यात सफाई कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे.त्यामुळे त्यांच्या वेतन,सेवा,आरोग्य, निवास व आर्थिक सुरक्षिततेशी संबंधित प्रलंबित प्रश्नांचा...

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत विद्यार्थ्यांमध्ये उत्तम मूल्यसंस्कार रुजविणे काळाची गरज-शिक्षणमंत्री दादाजी भुसे – ‘चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत आज विविध शाळांना प्रत्यक्ष भेटी.. – पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शाळेत केवळ पुस्तकी ज्ञान देणे पुरेसे नसून गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच भावी पिढीवर राष्ट्रभक्तीचे आणि उत्तम मूल्यांचे संस्कार रुजवणे गरजेचे आहे.गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातही...

अजब लाचेची गजब कहाणी..! दोन्ही हातांच्या दहा बोटांचा इशारा करून मागितली १० हजाराची लाच.. – पोलीस उपनिरीक्षक व पोलीस अंमलदार एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  छत्रपती संभाजीनगर :-राज्याच्या विविध भागात सरळ-सरळ तोंडी बोलणी करून अनेकजण लाच घेतांना व एसीबीच्या जाळ्यात अडकतांना दिसून येतात.पण, नुकतेच छत्रपती संभाजीनगर(पूर्वीचे औरंगाबाद)शहरात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!