- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-नागपूर जिल्ह्यात शालार्थ आयडी घोटाळा उघडकीस येताच अनेकांचे धाबे दणाणले होते. मोठ-मोठे मासे जाळ्यात अडकून पडल्याने शिक्षण विभागासह शिक्षकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. अश्यातच शिक्षण विभागातील बदल्या आणि नियुक्त्यांवरून मोठी आर्थिक देवाणघेवाण होत असल्याच्या चर्चेअंती शासनाने मोठा बदल केला आहे. पूर्वी खासगी अनुदानित शाळेतील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी प्राथमिक शिक्षणाधिकारी व उपसंचालक यांची मान्यता घ्यावी लागत असे.ही मान्यता घेतांना काही प्रकरणात अनियमितता झाल्याचे आरोप आहेत.त्यामुळे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकार हे थेट आयुक्तांना देण्यात आले आहेत.बनावट कागदपत्रांच्या आधारे विना अनुदानित शाळेतून अनुदानित शाळेत नियुक्ती देण्यात आली आणि संबंधितास शालार्थ आयडी देऊन पगारही सुरू करण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता,विना अनुदानित शाळेतून अनुदानित शाळेतही बदली करण्यात आल्याचे प्रकार झाल्याची माहिती आहे.अशी बदली करतांना शिक्षणाधिकारी व उपसंचालक यांची मान्यता घेणे आवश्यक होते.परंतु, नियमबाह्यरीत्या अशा बदल्यांना मान्यता देण्याचेही प्रकार समोर आल्याने अनियमितता बघता शासनाने हे अधिकार आता शिक्षण आयुक्तांकडे दिले आहे.
- Advertisement -

