Monday, July 13, 2026
Homeनागपूरदिवाळीत लागलेल्या आगीची तक्रार; तब्बल १८ जणांवर गुन्हे दाखल..! - तब्बल चार...

दिवाळीत लागलेल्या आगीची तक्रार; तब्बल १८ जणांवर गुन्हे दाखल..! – तब्बल चार वर्षे फायर ऑडिटच नाही..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-यंदाच्या दिवाळीत फटाक्यांमुळे नागपूर शहरातील अनेक भागांमध्ये आगीच्या घटना घडल्या होत्या.विविध भागात ६ हून अधिक भागांत आगीचा भडका उडाला.फटाक्यांमुळे लागलेल्या आगीमुळे लाखोंचे नुकसान झाले होते.अश्यातच नागपूर शहरातील लक्ष्मीनगर येथील रिलायन्स मॉलच्या ९ मजली इमारतीला २२ ऑक्टोंबरच्या रात्री ९ वाजता आग लागून आगीत अपार्टमेंटमधील इलेक्ट्रिक वायरिंग,वॉशिंग मशीन,इलेक्ट्रिक साहित्य,एसी व इतर मौल्यवान साहित्य असे एकूण जवळपास ५० लाखांचे नुकसान झाले होते. आग लागल्याची माहिती मिळताच नागपूर महानगर पालिकेचे अग्नीशामक दल घटनास्थळी दाखल झाले. आग मोठी लागली असल्याने वाढत गेली.रात्रभर ६ अग्निशामक बंबच्या साह्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले होते.यासोबतच फटाक्यांच्या आतषबाजीमुळे नागपूर शहराच्या विविध भागात आगीच्या तब्बल सहा घटना घडल्या होत्या.फटाक्यांच्या ठिणग्या कचरा व वाहनावर उडाल्याने अनेक ठिकाणची वाहने जळून खाक झाली होती.अश्यातच आता नागपूरच्या लक्ष्मीनगर येथील रिलायन्स मॉलच्या ९ मजली इमारतीला आग लागल्याप्रकरणी इमारतीतील रहिवासी अनिल द्वारकादास गांधी वय ६८ वर्षे यांनी तक्रार दाखल केल्याने बजाजनगर पोलिसांनी रिलायन्स मॉलचे अधिकारी,जमीन लीजवर देणारे १२ व्यक्ती आणि महाचायचे अधिकारी अशा १८ जणांविरुद्ध कलम १२५,१२६(१),२८७,३२९(१), ३२४(१),३२६(एफ), ३२६ (जी),३(५)नुसार गुन्हा दाखल केला आहे.रिलायन्स मॉलच्या इमारतीत निवासी आणि व्यावसायिक गाळे आहेत.रिलायन्स स्मार्ट सुपर स्टोअर मॉलने २०२१ नंतर कुठलेही फायर ऑडिट केले नव्हते.अनिल गांधी यांनी वारंवार रिलायन्स स्मार्टचे अधिकारी व जागेच्या मालकांना सूचना दिली होती.परंतु,त्याबाबत काहीच उपाययोजना न केल्यामुळे ही भीषण आग लागली आणि अपार्टमेंटमधील इलेक्ट्रिक वायरिंग,वॉशिंग मशीन, इलेक्ट्रिक साहित्य,एसी व इतर मौल्यवान साहित्य जळून खाक झाले,त्यामुळे लाखोंचे नुकसान झाले.वेळीच उपाययोजना केल्या असत्या तर अशी घटना घडली नसती.प्रकरणी १८ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली येथे नव्याने सुरू झालेल्या केंद्रीय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ५ वी मधील रिक्त जागांसाठी प्रवेश...

आता मार्केटमध्ये येणार दहा किलो वजनाचा गॅस सिलेंडर..

उद्रेक न्युज वृत्त:-बऱ्याच ठिकाणी जागेचा अभाव, वजनी सिलेंडर तसेच वजनानुसार वाढणारी रक्कम सर्वसामान्यांना न झेपावणारी असते.विशेषतः लहान व्यावसायिक,हॉटेल चालक आणि रस्त्यावरील विक्रेते. यासाठी सरकारी...

वाघ दिसताच पळत सुटले; जीव वाचवण्यासाठी धावत असतांनाच बंधाऱ्यात पडले,बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.शेतावर गेलेले तिघेजण वाघ दिसताच जिकडे बनेल तिकडे धावत-पळत सुटले.पण जीव वाचवण्यासाठी बंधाऱ्यावरून...

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!