उद्रेक न्युज वृत्त :-पूर्वी दोन महिने वा त्याहून अधिक महिने लाईट बिल भरले नाही तरीही चालत होते आणि काही दिवसांसाठी वीज पुरवठा खंडित करून संपूर्ण बिल भरल्यास वीज पुरवठा सुरळीत केला जात होता.मात्र,आता जुलै महिन्यापासून पूर्वीची चालत आलेली परंपरा बंद करून विद्युत वितरण कंपनीने थकीत बिल वसूल करण्याच्या नावाखाली नवा फंडा आणला आहे.विद्युत वितरण कंपनीच्या नव्या फंड्यानुसार आता ज्या वीजग्राहकांनी दोन महिन्यांचे विद्युत बिल भरलेले नाहीत,अश्यांच्या सुरक्षा ठेव म्हणून जमा असलेल्या ठेवीतून थकबाकीची रक्कम कपात केली जाईल,असा निर्णय विद्युत वितरण कंपनीने घेतलेला आहे.(सुरक्षा ठेव रक्कम ही आपल्याकडे आलेल्या लाईट बिलावर दिलेली असते)याची अंमलबजावणी जुलैपासून सुरू झाली आहे.महावितरण कंपनी आर्थिक अडचणीत सापडत असल्याचे कारण देत सदरचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे.त्यामुळे आता सलग दोन महिन्यांचे वीज बिल थकल्यास तिसऱ्या महिन्यात ग्राहकांच्या सुरक्षा ठेवीतून थकबाकीची रक्कम कपात केली जाणार आहे.सदरची रक्कम एकदा कपात झाली की,नंतर ग्राहकाला प्रथम सुरक्षा ठेवीची रक्कम व त्यानंतर बिलातील इतर शिल्लक रक्कम भरणे बंधनकारक असेल.रक्कम न भरल्यास ग्राहकाचा वीजपुरवठा खंडित केला जाईल.त्यानंतर ग्राहकाला पुरवठा पुन्हा सुरू करण्यासाठी सुरक्षा ठेव, बिलाची थकबाकी भरावी लागेल.शुल्क भरूनच वीज जोडणी पूर्ववत करता येणार आहे.सदरच्या निर्णयामुळे विद्युत ग्राहकांना एकप्रकारे जोरदार झटकाच मिळाला म्हणावे लागेल.
विद्युत वितरण कंपनीचा ग्राहकांना जोरदार झटका..! दोन महिने बिल न भरल्यास सुरक्षा ठेवीतून रक्कम करणार कपात..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

