Thursday, April 30, 2026
Homeगडचिरोलीअशी होणार कृषी केंद्रांवर कारवाई...- शेतकरी बांधवांनी न घाबरता करावी तक्रार..

अशी होणार कृषी केंद्रांवर कारवाई…- शेतकरी बांधवांनी न घाबरता करावी तक्रार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- जिल्ह्यात उन्हाळी हंगाम सुरू असून धान पिकासाठी चिखलनी केल्या नंतर धानपीक वाढीच्या अवस्थेमध्ये शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांची मागणी असते.कृषी केंद्रधारकांना पॉस मशिनद्वारे खत विकणे केंद्र शासनाने अनिवार्य केले आहे.परंतु यानंतरही जिल्ह्यातील काही कृषी केंद्र संचालक ऑफलाइन पद्धतीने अनुदानित खताची विक्री करतांना दिसून येतात.खरीप आणि रब्बी हंगामात शेतकऱ्यांची खते,बियाणांची मागणी लक्षात घेता काही कृषी केंद्र चालक अतिरिक्त दराने खताची विक्री करुन शेतकऱ्यांची लूट करीत असतात.मात्र शेतकरी बांधव संबंधित कृषी केंद्र चालकांची तक्रार करीत नसल्याने कारवाई केली जात नाही.कारवाई साठी शेतकरी बांधवांनी सामोरे येण्याची गरज आहे.अनुदानित खताची ऑफलाइन पद्धतीने खताची विक्री करणे, परवाना ग्राहकास सहज दिसेल अशा ठिकाणी न लावणे,भावसाठा फलक अद्ययावत न ठेवणे, परवान्यामध्ये उगम प्रमाणपत्र नसतांना निविष्ठा विक्री करणे,साठा व विक्री रजिस्टर न ठेवणे,फॉर्म एनमध्ये साठा नोंदवही न ठेवणे,बिलावर शेतकऱ्यांची स्वाक्षरी न घेणे तसेच बॅच नंबर,उत्पादनाची तारीख न लिहिणे आदी न आढळल्याने कृषी केंद्रांवर कारवाई करण्यात येते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर कुरखेडा नगरपंचायत सफाई कामगारांच्या बेमुदत संपावर तोडगा; संप मागे..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा नगरपंचायत अंतर्गत कार्यरत सफाई कामगारांंनी थकीत वेतनाकरीता मागील २३ एप्रीलपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले होते.त्यामुळे शहरातील स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण...

कायदा हा लवचिक आणि बदलत्या काळाशी सुसंगत असावा- सर्वोच्च न्यायालय – गर्भपाताची परवानगी दिली नाही; तर पीडितेच्या मनावर आयुष्यभर न पुसली जाणारी जखम आणि...

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच २४ एप्रिल २०२६ रोजी न्यायमूर्ती बी.व्ही.नागरत्ना आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाने एका १५ वर्षीय बलात्कार पिडीत तरुणीला ३० आठवड्यांचा...

बच्चू कडूंनी धनुष्यबाण घेतला हाती; शेतकरी,मजूर,दिव्यांगांसाठी निर्णय..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दिव्यांग,शेतकरी आणि गोरगरिबांसाठी लढणारा 'रॉबिनहूड' नेता माजी मंत्री तथा प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आज,गुरुवार ३० एप्रिल रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री...

शहरी भागात क्युआर कोड असलेली विवाह प्रमाणपत्रे द्या.. – देसाईगंज भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-डिजिटल इंडिया मोहिमेअंतर्गत सध्या स्थितीत अनेक शासकीय कागदपत्रे ऑनलाइन आणि सुरक्षित केली जात आहेत.यात विवाह नोंदणी प्रमाणपत्राचाही समावेश आहे.विवाह नोंदणी प्रमाणपत्राला विशेष...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!