Friday, May 22, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्त'ना बाप बडा ना भैय्या,सबसे बडा रुपय्या'; देशावर १७४ लाख कोटी रुपयांचे...

‘ना बाप बडा ना भैय्या,सबसे बडा रुपय्या’; देशावर १७४ लाख कोटी रुपयांचे कर्ज

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-सत्तेवर कुणीही असो,ताळमेळ जुळत नसल्याने अनेकांना कर्जाशिवाय पर्यायच नसतो,असे म्हटले जाते.एखादा मोठा व्यवसाय करतो म्हटले तर कर्ज काढावेच लागते.त्यातच एवढा मोठा देश सांभाळणे जिकिरीचे असते.त्यामुळे ‘ना बाप बडा ना भैय्या,सबसे बडा रुपय्या’ असे उगीचच म्हटले जात नाही.भारताच्या स्वातंत्र्याला २०२४ साली ७५ वर्षे पूर्ण झाली.त्यापैकी पहिल्या ६५ वर्षांत म्हणजेच २०१२ पर्यंत भारतावर ५६ लाख कोटी रुपयांचे कर्ज होते,तर २०१४ ते २०२४ या काळात १७४ लाख कोटी रुपये कर्ज झाले आहे.केंद्राच्या या वर्षीच्या म्हणजेच २०२५-२६ बजेटमध्ये वर्षाखेरपर्यंत हाच कर्जाचा आकडा २१६ ते २२० लाख कोटीपर्यंत जाण्याचा केंद्र सरकारचा अंदाज आहे.भारत सरकारच्या कर्जाची वर्षानुवर्षाची आकडेवारी ही प्रामुख्याने वित्त मंत्रालयाच्या अहवालांवर,भारतीय रिझर्व्ह बँकेच्या डेटावर किंवा आंतरराष्ट्रीय मुद्रा निधी म्हणजेच आयएमएफ सारख्या संस्थांच्या अंदाजावर आधारित असते.सन २०१२ पर्यंत भारतावर एकूण कर्ज ५६ लाख कोटी रुपये होते.ही आकडेवारी २०१२-१३ च्या केंद्रीय बजेटशी सुसंगत आहे,जिथे कर्ज सुमारे ५२-५६ लाख कोटी रुपये दर्शवले गेले होते.२०१४ ते २०२४ या १० वर्षांत कर्ज १७४ लाख कोटी रुपये झाले.साधारणपणे, २०१४ मध्ये कर्ज ५५-५६ लाख कोटी रुपये होते आणि २०२४ पर्यंत ते १७४ लाख कोटी रुपये झाले.कर्जाच्या या आकडेवारीत आंतरिक तसेच बाह्य म्हणजेच देशांतर्गत आणि आंतरराराष्ट्रीय कर्जाचा समावेश आहे.

(सदरची आकडेवारी वित्त मंत्रालयाच्या “India’s External debt: A Status Report”, RBI च्या अहवाल आणि केंद्रीय बजेटवर आधारित आहे.)

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तब्बल ४३४ रिक्त पदांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन.. – पदांनुसार मासिक वेतन मिळणार १६ हजार रुपयांपासून ते ५० हजार रुपयांपर्यंत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच उद्योगांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता...

उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या बालकांना मिळणार राष्ट्रीय स्तरावरील गौरव.. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत सन-२०२७ साठी दिल्या जाणाऱ्या ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’साठी अर्ज मागविण्यात आले आहेत.शिक्षण,कला,सांस्कृतिक कार्य,क्रीडा, नाविन्यपूर्ण शोध,सामाजिक...

अज्ञात वाहनाची दुचाकीला जोरदार धडक; एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर आज,शुक्रवार २२ एप्रिल रोजी भीषण अपघाताची घटना दुपारच्या सुमारास उघडकीस आली.विरूध्द दिशेने भरधाव वेगात असलेल्या एका अज्ञात...

प्रलंबित बिल आणि नवीन काम देण्यासाठी दोन टक्के दराने मागितले ७० हजार.. -जलसंपदा विभागातील अधीक्षक अभियंता एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कामाचे प्रलंबित असलेले बिल काढून देण्यासाठी व नवीन काही कामे तुम्हालाच देणार म्हणून दोन टक्के प्रमाणे ७० हजाराची लाचेची मागणी करणाऱ्या जलसंपदा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!