- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नंदुरबार :-दारूमुळे गावातील अनेकजण व्यसनाच्या आहारी जाऊन,कित्तेकांची संसारे उघड्यावर पडून उद्ध्वस्त झाली आहेत.त्यामुळे गावात सुरू असलेली दारू बंद करण्यात यावी; यासाठी गावकरी,महिला वर्ग अनेक वर्षांपासून लढा देत आहेत.मात्र,दारूबंदी होण्याचे नावच घेत नसल्याने प्रशासनाकडे पाठपुरावा करून सर्वानुमते मतदान करण्याचे ठरले.त्यानुसार नंदुरबार जिल्ह्याच्या शहादा तालुक्यातील असलोद गावात दारूबंदी करण्यासाठी गावकरी आणि सामाजिक संघटनांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर आज,रविवारी ८ डिसेंबरला गावात दारूबंदीसाठी बॅलेट पेपरवर महिलांचे मतदानास सुरुवात झाली.सकाळपासूनच मतदानासाठी महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून आला. दारूबंदीसाठी मतदान घेणारे असलोद हे नंदुरबार जिल्ह्यातील पहिले गाव ठरले असून यात आडवी बाटली व उभी बाटली मतदान चिन्ह आहेत.गावात दारूबंदीची मागणी अनेक वर्षापासून होती अखेर पाठपुराव्यानंतर गावात दारूबंदीसाठी मतदान घेण्याचा निर्णय घेण्यात आला असून गावातील १२६० महिला मतदार दारूबंदीसाठी मतदान करणार असल्याचे तहसीलदार गिरासे यांनी कळविले.
गावात दारूबंदीच्या मागणीसाठी गावकरी अनेक वर्षांपासून लढा देत आहेत.मात्र,दारूबंदी होत नसल्याने गावात दारूबंदी करण्यासाठी महिला एकटवल्या.सर्वांनी एकत्र येत मतदानाची मागणी केली होती.अखेर प्रशासनाने मागणी मंजूर केली व मतदान घेण्यात आला.
- Advertisement -

