- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-आम्ही ‘वन नेशन, वन इलेक्शन’वर काम करत आहोत.याला लवकरच मंजुरी दिली जाईल.या निर्णयामुळे भारताची लोकशाही मजबूत होईल.तसेच विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी देशाला नवी गती मिळेल,याशिवाय भारत आता समान नागरी कायद्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे; हा कायदा लवकरच आणला जाईल,असे स्पष्ट प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘राष्ट्रीय एकता दिवस’प्रसंगी केले.
पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत.यादरम्यान त्यांनी गुरुवारी केवडिया येथील स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४९ व्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली.दरवर्षी ३१ ऑक्टोंबर रोजी पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस साजरा केला जातो.त्यासाठी भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी सर्व देशवासीयांना ‘राष्ट्रीय एकता दिना’च्या शुभेच्छा दिल्या. एकतानगरमध्ये त्यांनी २८० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली.
राष्ट्रीय एकता दिवस एक अद्भुत योगायोग घेऊन आला आहे.आज एकीकडे आपण एकात्मतेचा उत्सव साजरा करत आहोत; तर दुसरीकडे दिवाळीचा सण आहे,याचा मोदी यांनी उल्लेख केला.ते पुढे म्हणाले, गेल्या १० वर्षांत भारताने विविधतेत एकात्मतेने जगण्याच्या प्रत्येक प्रयत्नात यश मिळवले आहे.आज जगभरात एक राष्ट्र,एक ओळख म्हणजेच आधारची चर्चा होत आहे.आम्ही एक राष्ट्र,एक कर प्रणाली तयार केली.वन नेशन,वन ग्रीड ही संकल्पना पूर्ण केली. आयुष्मान भारताच्या रूपाने देशाला वन नेशन,वन इन्शुरन्सची सुविधा दिली आहे.आता आम्ही वन नेशन,वन इलेक्शनवर काम करत आहोत.यामुळे भारताची लोकशाही मजबूत होईल.यामुळे भारत विकास आणि समृद्धीचा नवा वेग गाठेल.
- Advertisement -

