Wednesday, April 15, 2026
Homeनागपूरशिक्षकाचे विद्यार्थ्यांसोबत अभद्र व्यवहार; शिक्षकाला अटक..

शिक्षकाचे विद्यार्थ्यांसोबत अभद्र व्यवहार; शिक्षकाला अटक..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-दोन अल्पवयीन मुली आणि ११ मुलांसोबत अभद्र व्यवहार करून छेडखानी करणाऱ्या नागपूरच्या सदर येथील एसएफएस स्कूलमधील शिक्षकाला सदर पोलिसांनी शाळेच्या प्राचार्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अटक केली आहे.संकल्प वीरेंद्र मेढा वय ४७ वर्षे,रा.मेढा भवन,सेंट्रल एवेन्यू,असे अटक करण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव आहे.मेढा याने २०१७ मध्ये एसएफएस स्कूलमध्ये शिक्षकाची नोकरी सुरू केली.तो इंग्रजी आणि इतिहास विषय शिकवितो.सोबतच आपल्या घरी दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो.
मेढा याच्या विरुद्ध एसएफएस स्कूलमधील दोन अल्पवयीन मुली आणि ११ विद्यार्थ्यांनी अभद्र बोलण्यासह,पाण्याच्या बॉटल डस्टर फेकून मारणे, पालकांबाबत विद्यार्थ्यांना आपत्तीजनक बोलणे आणि त्यांच्याशी हा शिक्षक अभद्र व्यवहार करीत असल्याची तक्रार दिली होती.
त्यानंतर २४ ऑगस्टला शाळेच्या प्राचार्यांनी तीन शिक्षकांची समिती नेमली.या समितीने शाळेतील विद्यार्थ्यांचे बयाण नोंदवून ३० ऑगस्टला याबाबत प्राचार्यांना अहवाल सादर केला.त्यावर प्राचार्यांनी मेढा याला सात दिवसात उत्तर सादर करण्यास सांगितले.
मेढा याने शिक्षकदिनी ५  सप्टेंबरला आपले उत्तर प्राचार्याकडे सादर केले.त्यानंतर एसएफएस स्कूलच्या प्राचार्यानी सोमवारी ९ सप्टेंबरला मेढा याच्या विरुद्ध सदर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
सदर पोलिसांनी आरोपी शिक्षक मेढा विरुद्ध कलम २९६,७४,११५ (२),३५२ (२),सहकलम १२ पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपी शिक्षकाला अटक केली.परंतु विद्यार्थ्यांनी लावलेले आरोप चुकीचे असून एसएफएस स्कूल सोडून गेलेल्या काही विद्यार्थ्यांशी आपला वाद झाला होता.याबाबत पाचपावली ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला होता. या प्रकरणामुळे आपल्या विरुद्ध खोटी तक्रार करण्यात आल्याचे अटक केलेला शिक्षक मेढा याने पोलिसांना दिलेल्या बयाणात सांगितले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उष्णतेची लाट; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,प्राथमिक व माध्यमिक शाळा राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-राज्याच्या विविध भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे.भारतीय हवामान विभागाने आज,बुधवार १५ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यास उष्णतेचा 'यलो अलर्ट' जाहीर केला होता.अश्यातच...

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १६ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत...

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील परिसरात वाघिणीने धुमाकूळ घालून गुरुवार,१९ मार्च २०२६ रोजी बाम्पेवाडा येथील ५० वर्षीय वसंत गणपत मेश्राम यांचा जीव घेतला...

आता प्रत्येक लाभार्थी कुटुंबास मिळणार तीन लिटर रॉकेल..

उद्रेक न्युज वृत्त :-जमाना कितीही बदलला तरीही 'जुनं ते सोनं' अशी अवस्था केवळ आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर झाल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र राज्याच्या विविध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!