Tuesday, July 7, 2026
Homeगडचिरोलीशासकीय काम; भरपूर मिळतो दाम....!- सर्वांचे खिसे गरम होण्यास थोडे दिवस थांब...शासकीय...

शासकीय काम; भरपूर मिळतो दाम….!- सर्वांचे खिसे गरम होण्यास थोडे दिवस थांब…शासकीय यंत्रणेतील प्रकार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- आपण नेहमीच म्हणतो व ऎकत असतो की,दोन नंबरचे काम दारू विक्री,सट्टा पट्टी,कोंबडे बाजार,तंबाखू विक्री व इतर विविध प्रकाचे अवैध धंदेच आहेत.मात्र या सर्वांच्याही वरचढ असलेले दोन नंबरचे काम ते म्हणजे शासकीय यंत्रणेतील काम आहे.अशातच ‘शासकीय काम; दोन नंबरचे भरपूर मिळतो दाम’ असे सर्वच शासकीय यंत्रणेतील प्रकार सर्वत्र दिसून येत आहे.सध्या स्थितीत साहित्य खरेदी एकीकडून केली जाते तर  बिले दुसरीकडून जोडली जात असून सर्वांचे खिसे गरम होण्यास थोडे दिवस थांब होत असल्यानेच शासकीय यंत्रणा चुप्पी साधण्याचा प्रयत्न करीत आहेत.

शासकीय यंत्रणेतील कामांमध्ये एक लाख रुपये कामाचे अंदाज पत्रक,तीन लाख रुपयाचे तयार केले जात असल्याने याचे नवल वाटते आहे.कमी लोहा वापरणे,कमी सिमेंट वापरणे,कमी गिट्टी वापरणे,कमी रेती वापरणे व पाच मजूर कामांवर असतांना दहा मजूर कामावर दाखवून अवाढव्य रक्कम उचल करणे,अशी अवस्था सर्वत्र दिसून येत आहे.यामध्ये सर्वांची टक्केवारी नियोजित ठरलेली असते.एका कामावर लाखो रुपये छापण्याचे काम सुरू आहे.

यामुळेच काम ‘झकास न होता भकास’ होतांना दिसून येते.कामावर न जाणाऱ्यांना मिस्त्री व मजूर म्हणून दाखविल्या जाते व उघडकीस येणारे प्रकरण जिल्हा परिषदे पासून तर पंचायत विभागपर्यंत दडपण आणून दाबल्या जाते; ही शोकांतिका आहे.एखादा ‘माजी बनतो व भाजी खातो’ तसाच प्रकार घडत असून ज्याला बांधकामविषयी कुठल्याही प्रकारचा अनुभव नसतांना एखादा तर सोडा तीन-तीन काम देत असतील तर यामध्ये काहीतरी झानगडगुत्ताच दिसून येतो आहे.

सर्वजण सर्वसामान्य जनतेला भुरळ घालत असून शासकीय बांधकाम करणारे किती जण परवाना धारक आहेत? शासकीय यंत्रणेत विना बांधकाम परवान्यांचे काम करतांना हल्ली दिसून येत आहेत.यांच्यावर निर्बंध कोण घालणार?फक्त टक्केवारी मिळाली व खिसे गरम झाले की ‘अपणा काम बनता; कही भी जाये जनता’ असे होत आहे.सर्वजण गाढ झोपेत गेले की काय?असे काम करणाऱ्यांविरोधात जोपर्यंत ठोस पावले उचलली जाणार नाही.तोपर्यंत असेच चित्र सर्वत्र दिसून येणार असल्याने अशांवर आळा घालणे गरजेचे आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाघांचे हल्ले काही केल्या थांबेना..! ऐन शेतीच्या हंगामातच वाघाने घेतला एकाचा जीव..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या चिमूर तालुक्यातील खडसंगी (बफर)वनपरिक्षेत्र व प्रादेशिक वनक्षेत्राच्या सीमेलगतच्या बरडघाट शेतशिवारात वाघाने एका ५० वर्षीय शेतकऱ्यावर हल्ला चढवून जीव घेतल्याची घटना...

कृषी विभागामार्फत खरीप हंगाम-२०२६ साठी पीकस्पर्धेचे आयोजन.. – स्पर्धेतील विजेत्यांना तालुका,जिल्हा आणि राज्यस्तरावर प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांकाची बक्षिसे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील अन्नधान्य,कडधान्य व गळीतधान्य पिकांची उत्पादकता वाढविणे,प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे तसेच आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने कृषी विभागामार्फत खरीप हंगाम...

उद्यापासून गडचिरोली,आरमोरी व देसाईगंज येथे जादूटोणा विरोधी कायदा व अंधश्रद्धा निर्मूलनावर प्रबोधन कार्यक्रम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जादूटोणा विरोधी कायदा तसेच अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत समाजामध्ये जनजागृती व प्रबोधन व्हावे,या उद्देशाने गडचिरोली जिल्ह्यात विशेष प्रबोधन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या...

संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात १५ दिवस मनाई आदेश लागू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ मधील कलम ३७(१)(३)अन्वये ५ जुलै २०२६ रोजी रात्री १२.०१ वाजल्यापासून ते १९...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!