- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-जिल्ह्याच्या सिरोंचा तालुक्यातील जानमपल्ली येथे शेतातील विहिरीचे खोदकाम करतांना अचानकपणे तीन मजुरांच्या अंगावर मातीचा ढिगारा कोसळल्याने दोन मजुरांचा मृत्यू झाला तर एक मजूर थोडक्यात बचावला असल्याची घटना आज,मंगळवार ८ एप्रिल रोजी सकाळी पावणे दहाच्या सुमारास घडली.कोंडा समय्या वय ३६ वर्षे रा.
जानमपल्ली,ता.सिरोंचा व उप्पूला रवी वय ३१ वर्षे रा.जानमपल्ली,ता.सिरोंचा अशी मातीच्या
ढिगाऱ्याखाली दबून मृत्यु झालेल्या मजुरांची नावे आहेत.तर संतोष कोनम वय ३२ वर्षे रा.जानमपल्ली हा थोडक्यात बचावला आहे.
माहितीनुसार,सिरोंचा तालुक्याच्या जानमपल्ली येथील शेतकरी धन्नाडा समक्का या शेतकऱ्याच्या शेतात विहीर बांधकामाचे काम सुरू असून आज,मंगळवारी सकाळच्या सुमारास विहिरीच्या आतमध्ये तीन मजुरांद्वारे खोदकाम सुरू होते.सदर विहिरीचे खोदकाम हे जवळपास ५० फूट खोलपर्यंत जाऊन पाण्यासाठी आणखी खोदकाम करीत असतांना अचानकपणे खालच्या स्तरातील माती व वरच्या स्तरावरील माती तिन्ही मजुरांवर कोसळली.त्यामुळे कोंडा समय्या व उप्पूला रवी मातीच्या ढिगाऱ्याखाली बराच काळ दबल्या गेले.अशातच तिसरा मजूर संतोष कोनम हा अर्धवट दबल्या गेल्याने माती ओढण्यासाठी विहिरीच्या नजीक असलेल्या मजुरांनी त्याला दोरखंडाणे ओढून बाहेर काढले.लागलीच सदरची घटना ग्रामस्थांच्या लक्षात येताच पोलीस प्रशासन, स्थानिक पदाधिकारी यांनी बचाव कार्य सुरू केले.मात्र,बराच वेळ मातीच्या ढिगाऱ्याखाली राहिल्याने दोन्ही मजुरांचा मृत्यू झाला.सदर घटनेचा पुढील तपास सिरोंचा पोलीस प्रशासन करीत आहे.
- Advertisement -

