Sunday, July 26, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तविद्युत वितरण कंपनीचा ग्राहकांना जोरदार झटका..! दोन महिने बिल न भरल्यास सुरक्षा...

विद्युत वितरण कंपनीचा ग्राहकांना जोरदार झटका..! दोन महिने बिल न भरल्यास सुरक्षा ठेवीतून रक्कम करणार कपात..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-पूर्वी दोन महिने वा त्याहून अधिक महिने लाईट बिल भरले नाही तरीही चालत होते आणि काही दिवसांसाठी वीज पुरवठा खंडित करून संपूर्ण बिल भरल्यास वीज पुरवठा सुरळीत केला जात होता.मात्र,आता जुलै महिन्यापासून पूर्वीची चालत आलेली परंपरा बंद करून विद्युत वितरण कंपनीने थकीत बिल वसूल करण्याच्या नावाखाली नवा फंडा आणला आहे.विद्युत वितरण कंपनीच्या नव्या फंड्यानुसार आता ज्या वीजग्राहकांनी दोन महिन्यांचे विद्युत बिल भरलेले नाहीत,अश्यांच्या सुरक्षा ठेव म्हणून जमा असलेल्या ठेवीतून थकबाकीची रक्कम कपात केली जाईल,असा निर्णय विद्युत वितरण कंपनीने घेतलेला आहे.(सुरक्षा ठेव रक्कम ही आपल्याकडे आलेल्या लाईट बिलावर दिलेली असते)याची अंमलबजावणी जुलैपासून सुरू झाली आहे.महावितरण कंपनी आर्थिक अडचणीत सापडत असल्याचे कारण देत सदरचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे.त्यामुळे आता सलग दोन महिन्यांचे वीज बिल थकल्यास तिसऱ्या महिन्यात ग्राहकांच्या सुरक्षा ठेवीतून थकबाकीची रक्कम कपात केली जाणार आहे.सदरची रक्कम एकदा कपात झाली की,नंतर ग्राहकाला प्रथम सुरक्षा ठेवीची रक्कम व त्यानंतर बिलातील इतर शिल्लक रक्कम भरणे बंधनकारक असेल.रक्कम न भरल्यास ग्राहकाचा वीजपुरवठा खंडित केला जाईल.त्यानंतर ग्राहकाला पुरवठा पुन्हा सुरू करण्यासाठी सुरक्षा ठेव, बिलाची थकबाकी भरावी लागेल.शुल्क भरूनच वीज जोडणी पूर्ववत करता येणार आहे.सदरच्या निर्णयामुळे विद्युत ग्राहकांना एकप्रकारे जोरदार झटकाच मिळाला म्हणावे लागेल.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शेतातील सागवानाची ५०० झाडे जळून खाक; विद्युत वितरण कंपनीला ग्राहक आयोगाचा दणका..

उद्रेक न्युज वृत्त :-यवतमाळ जिल्ह्यातील नागरिक आपल्या न्याय हक्काचा लढा नेहमी लढतांना दिसून येतात.ग्राहक तक्रार निवारण आयोगात धाव घेत शेतकरी साहित्यातील त्रुटी असोत वा...

अखेर विद्यार्थी आंदोलनाचा मोठा विजय; केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा.

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून राजधानीतील जंतर-मंतर येथे नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आज...

नशामुक्त युवा विकसित भारत’ अभियानांतर्गत जिल्हास्तरीय विविध स्पर्धांचे आयोजन.. – विजेत्या स्पर्धकांना जिल्हास्तरीय पारितोषिकांसह राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या मेरा युवा भारत(MY Bharat) उपक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या "नशामुक्त युवा विकसित भारत" या राष्ट्रव्यापी अभियानाच्या...

‘डायल ११२’ वर खोटी माहिती देत असाल तर सावधान; कारावासासह दंडाची शिक्षा.. – खोटी माहिती दिल्याने तरुणावर गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :- 'डायल ११२' हा भारत सरकारचा आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांक आहे.याद्वारे आपत्कालीन परिस्थितीत पोलिस व इतर काही महत्त्वाच्या सेवा एकाच नंबरवर जलद...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!