Saturday, April 18, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तवर्ल्डकप क्रिकेटचा जगज्जेता कोण? आज दुपारी क्रिकेटचे अंतिम युद्ध रंगणार…

वर्ल्डकप क्रिकेटचा जगज्जेता कोण? आज दुपारी क्रिकेटचे अंतिम युद्ध रंगणार…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :- आज दुपारच्या सुमारास होणारा आयसीसी क्रिकेट विश्वचषक अंतिम सामना रंगतदार होणार आहे.तब्बल २० वर्षानंतर विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारत आणि ऑस्ट्रेलिया एकमेकांशी भिडणार आहेत.२००३ मध्ये ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा शेवटचा पराभव केला होता.त्या पराभवाचा बदला घेण्यासाठी भारत मैदानात उतरणार आहे.भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात क्रिकेटचा जगज्जेता कोण? यासाठी अंतिम युद्ध रंगणार असून मैदानी युद्धभूमी अहमदाबादचे नरेंद्र मोदी स्टेडियम आहे.सामना आज दुपारी सुरू होणार असला तरी स्टेडियमबाहेर चाहत्यांनी सकाळपासूनच गर्दी केली आहे.स्टेडियममध्ये १.२५ लाखांहून अधिक प्रेक्षक पोहोचण्याची अपेक्षा आहे.दरम्यान भारतीय टीम स्टेडियममध्ये दाखल झाली आहे.अभिनेत्री आणि भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा भारत आणि ऑस्ट्रेलिया सामन्यासाठी अहमदाबादच्या स्टेडियमकडे रवाना झाली आहे. भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर वर्ल्ड कपचा अंतिम सामना पाहण्यासाठी अहमदाबादला पोहोचला आहे.मुंबईत खेळल्या गेलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यातही सचिन उपस्थित होता.आज दुपारी सुरू होणाऱ्या आयसीसी क्रिकेट विश्वचषक अंतिम सामन्यात बाजी मारणार कोण? याकडे सर्वांच्या नजरा भिडल्या आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धावत्या कारने अचानक घेतला पेट; सुदैवाने जीवितहानी टळली..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुलाचा सैनिकी शाळेच्या प्रवेश परीक्षेचा पेपर असल्याने चारचाकी वाहनाने गडचिरोलीसाठी निघालेल्या कुटुंबियांच्या कारने अचानकपणे आरमोरी-गडचिरोली मार्गावर पेट घेतल्याची घटना आज,शनिवार १८...

उन्हाच्या तडाख्यात कोसळणार अवकाळी पावसाच्या सरी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उन्हामुळे लाहीलाही होत आहे.सकाळी दहा वाजल्यापासूनच उकाड्याने नागरिक हैराण होऊ लागलेत.अनेक जिल्ह्यांचा पारा दिवसागणिक वाढू लागल्याने दुपारच्या...

वाढत्या उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्याचे आवाहन.. – उष्माघाताची लक्षणे आणि उपाययोजना..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-जिल्ह्यात सध्या तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून,कडक उन्हामुळे उष्माघात (Heat Stroke)होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही बाब गांभीर्याने घेत जिल्हा आरोग्य...

सावधान..! प्रधानमंत्री लोन योजनेच्या नावाने बनावट जाहिरातीचा आधार..

उद्रेक न्युज वृत्त :-हल्ली फसवणूक करणाऱ्यांचे नेटवर्क दिवसेंदिवस वाढत चालल्याने नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे झाले आहे.कोणत्याही मोठ्या आमिषाला बळी पडण्यापूर्वी माहितीची खातरजमा करणे अत्यंत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!