Wednesday, August 12, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तवर्ल्डकप क्रिकेटचा जगज्जेता कोण? आज दुपारी क्रिकेटचे अंतिम युद्ध रंगणार…

वर्ल्डकप क्रिकेटचा जगज्जेता कोण? आज दुपारी क्रिकेटचे अंतिम युद्ध रंगणार…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :- आज दुपारच्या सुमारास होणारा आयसीसी क्रिकेट विश्वचषक अंतिम सामना रंगतदार होणार आहे.तब्बल २० वर्षानंतर विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारत आणि ऑस्ट्रेलिया एकमेकांशी भिडणार आहेत.२००३ मध्ये ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा शेवटचा पराभव केला होता.त्या पराभवाचा बदला घेण्यासाठी भारत मैदानात उतरणार आहे.भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात क्रिकेटचा जगज्जेता कोण? यासाठी अंतिम युद्ध रंगणार असून मैदानी युद्धभूमी अहमदाबादचे नरेंद्र मोदी स्टेडियम आहे.सामना आज दुपारी सुरू होणार असला तरी स्टेडियमबाहेर चाहत्यांनी सकाळपासूनच गर्दी केली आहे.स्टेडियममध्ये १.२५ लाखांहून अधिक प्रेक्षक पोहोचण्याची अपेक्षा आहे.दरम्यान भारतीय टीम स्टेडियममध्ये दाखल झाली आहे.अभिनेत्री आणि भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा भारत आणि ऑस्ट्रेलिया सामन्यासाठी अहमदाबादच्या स्टेडियमकडे रवाना झाली आहे. भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर वर्ल्ड कपचा अंतिम सामना पाहण्यासाठी अहमदाबादला पोहोचला आहे.मुंबईत खेळल्या गेलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यातही सचिन उपस्थित होता.आज दुपारी सुरू होणाऱ्या आयसीसी क्रिकेट विश्वचषक अंतिम सामन्यात बाजी मारणार कोण? याकडे सर्वांच्या नजरा भिडल्या आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी नवीन सेवार्थ प्रणाली लागू.. – ‘डेटा मायग्रेशन’ व पायलट वेतन देयक प्रक्रिया तात्काळ पूर्ण करण्याचे आवाहन.. – सुट्टीच्या दिवशीही कोषागार...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतनाची प्रक्रिया अधिक वेगवान,सुलभ आणि सुरक्षित करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाच्या वित्त विभागाच्या १ जुलै २०२६ च्या शासन...

आता राष्ट्रीय गीत असलेल्या ‘वंदे मातरम्’ला कायदेशीर संरक्षण प्राप्त.. -कोणत्याही शासकीय कार्यक्रमात ‘वंदे मातरम्’ प्रथम गायले जाईल..

उद्रेक न्युज वृत्त :-देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल मंगळवारी 'राष्ट्रीय प्रतिष्ठा अवमान निवारण (सुधारणा)विधेयक २०२६' ला मंजुरी दिल्याने आता राष्ट्रीय गीत असलेल्या 'वंदे मातरम्'ला...

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत पिकांच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटला.. – कुरखेडा तालुक्यातील शेतकऱ्याने सांगितला आनंददायक अनुभव..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :- "नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोकरा)योजनेअंतर्गत मी ३० पाईपची मागणी केली होती.पाईप खरेदी केल्यानंतर अवघ्या ८ दिवसांच्या आत माझ्या खात्यात ८०...

कारची ट्रकला मागून जोरदार धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीत आज,बुधवार १२ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दोन अल्पवयीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला; तर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!