Sunday, May 31, 2026
Homeनागपूरवर्दळीच्या भागात स्फोटके आढळल्याने खळबळ..

वर्दळीच्या भागात स्फोटके आढळल्याने खळबळ..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-शहराच्या गणेशपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वर्दळीच्या दोसर भवन चौक परिसरात उज्वल लांजेवार यांच्या इमारतीच्या खुल्या जागेमध्ये आज, मंगळवार ७ एप्रिल रोजी संशयास्पद स्फोटके  आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.एका बॅगेत ५० डिटोनेटर,८ कनेक्टर व १५ जिलेटीनच्या कांड्या आढळून आल्या.आज सकाळच्या सुमारास लांजेवार कुटुंबियातील सदस्य अंगणात गेले असता त्यांना एक संशयास्पद बेवारस बॅग दिसली.बॅग उघडून पाहिल्यावर त्यात स्फोटकासारखी सामग्री असल्याचे लक्षात येताच त्यांनी तात्काळ पोलिसांना कळवले.सूचना मिळताच गणेशपेठ पोलिसांनी त्वरित घटनास्थळी पोहोचून परिसराचा ताबा घेतला आणि सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण भाग सील केला.बॉम्ब शोधक व नाशक पथकाने  केलेल्या प्राथमिक तपासात १५ जिलेटिन कांड्या,५० डेटोनेटर आणि ८ कनेक्टर आढळून आले आहेत.
घटनेची गंभीरता लक्षात घेऊन पोलीस आयुक्त रविंद्र सिंगल स्वतः घटनास्थळी दाखल झाले.त्यांनी कुटुंबीयांशी चर्चा करून तपास वेगाने करण्याच्या सूचना दिल्या.ही स्फोटके येथे कशी आली आणि त्यामागे कोणाचा हात आहे, याचा शोध घेणे प्राधान्य असल्याचे त्यांनी सांगितले.दरम्यान,पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज ताब्यात घेतले असून,रात्री किंवा पहाटेच्या सुमारास कोणीतरी ही बॅग टाकून गेला का,याचा तपास सुरू आहे.या प्रकरणात दहशतवादी कटाचा कोणताही संबंध आहे का,याचीही चौकशी केली जात आहे.
जिलेटिनचा वापर सामान्यतः खाणकाम किंवा विहिरी खोदण्यासाठी केला जातो.मात्र,शहराच्या मध्यवर्ती आणि गजबजलेल्या भागात अशा प्रकारे स्फोटके सापडल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.त्यामुळे एटीएसकडूनही समांतर तपास होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तपास अधिक व्यापक करण्यासाठी ‘पेसो’ आणि फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी च्या तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे.सापडलेली स्फोटके किती जुनी आहेत आणि त्यांची क्षमता किती आहे,याचा अभ्यास केला जात आहे.
गणेशपेठ परिसर हा बस आणि रेल्वे स्थानकाच्या जवळ असल्याने येथे नेहमीच वर्दळ असते.या घटनेची माहिती समजताच मोठ्या संख्येने नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती.परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी आसपासची दुकाने तात्पुरती बंद करण्याचे आदेश दिले असून,नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.एकाचवेळी डिटोनेटर व जिलेटीनच्या कांड्या कुणी आणून ठेवल्या याचा मागोवा घेण्यात येत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शेतातील विहिरीत पडून वाघाचा मृत्यू; वन विभागात खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम/सिंदेवाही(चंद्रपूर):-ब्रम्हपुरी वन विभागांतर्गत येणाऱ्या सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील डोंगरगाव नियतक्षेत्र अंतर्गत हजारीचक(ता.सिंदेवाही) येथील शेतातील कठडे नसलेल्या विहिरीत पडून एका प्रौढ नर वाघाचा मृत्यू...

उद्यापासून वादळी पावसाचा अंदाज; शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-सध्या राज्यातील हवामानात बदल होण्यास सुरुवात झाली असून उद्या,सोमवार १ जून पासून सुरु होणाऱ्या आठवड्यातील हवामानात अजून बदल होणार आहे.हवामान खात्याने,प्रामुख्याने...

तरुणाने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-एका ३६ वर्षीय विवाहित तरुणाने राहत्या घरीच गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याची घटना आज,रविवार ३१ मे रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा शहरातील...

विवाहित महिलेचा गळा चिरून हत्या करणारा आरोपी अटकेत.. – क्षुल्लकशा कारणावरून हत्या; बालपणापासून होते प्रेमप्रकरण..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या राजुरा तालुक्यातील वेकोलिच्या धोपटाळा कामगार वसाहतीत एका विवाहित महिलेची धारदार शस्त्राने गळा चिरून निघृण हत्या करण्यात आल्याची थरारक घटना शुक्रवार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!