- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-तीन दिवसांपूर्वी किंचित घट नोंदविणाऱ्या सोन्याने काल,शुक्रवारी पुन्हा उच्चांक गाठत ऐन गुढीपाडवा सणाच्या आधीच २४ कॅरेटच्या तोळ्याचा भाव ९१ हजार ५०० रुपये झाल्याने सोने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडल्याशिवाय राहणार नसल्याचे सदरच्या भाव वाढीवरून दिसून येत आहे.
सध्या स्थितीत लगीन सराई सुरू झाली आहे.अनेक तरुण लग्नासाठी मुलींच्या शोधात आहेत.मात्र, अनेकांचे लग्नच जुळत नसल्याने वयोमानात वाढ होत आहे.लग्न जुळले तर लग्नात थोडे तरी सोने खरेदी करावी लागतात.अशातच आता लग्नाच्या मुलींसह सोनेही भाव खात असल्याने ‘इकडे आड व तिकडे विहीर’ अशी अनेकांची अवस्था झाली आहे.
सोमवारी सोने दरात १६० रुपयांची घसरण नोंदविली गेल्यानंतर,सलग दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी २५ मार्चला ३३० रुपयांनी सोने कमी झाले होते. त्यामुळे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दरात आणखी घसरण होईल,अशी अपेक्षा होती.परंतु,आठवड्याच्या अखेरच्या तीन दिवसांत सोने तब्बल १,६९० रुपयांनी वधारले. काल,शुक्रवारी २४ कॅरेट,प्रतितोळा ९१ हजार ५०० रुपयांचा दर नोंदविला गेला आहे.चांदी दरातील तेजी कायम असून,अवघ्या दोनच दिवसांत चांदी ४ हजार १०० रुपयांनी वधारली आहे.बुधवारी २६ मार्चला चांदीचे दर १ लाख ९०० रुपयांनी घसरले होते.मात्र,मागील दोन दिवसांत पुन्हा एकदा चांदी दराने उसळी घेत चांदी थेट १ लाख ५ हजारांवर गेली आहे.
- Advertisement -

