Monday, April 27, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तराहुल गांधी पंतप्रधान झाले,तर ते कहरच करतील; असे म्हणताच न्यायालयाने याचिकाकर्त्यालाच ...

राहुल गांधी पंतप्रधान झाले,तर ते कहरच करतील; असे म्हणताच न्यायालयाने याचिकाकर्त्यालाच फटकारले..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-पंकज कुमुदचंद्रा फडणीस यांनी राहुल गांधीविरोधात मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल केली होती.पंकज फडणीस
 हे अभिनव भारत काँग्रेस या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत.राहुल गांधी यांच्याकडून वीर सावरकरांबद्दल केल्या जाणाऱ्या बालिश आणि बेजबाबदार विधानांमुळे गोंधळ होतो,असा मुद्दा त्यांनी याचिकेत नमूद केला होता व राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल वाचन करावे आणि स्वतःचे ज्ञान वाढवावे,असे निर्देश न्यायालयाने त्यांना द्यावेत,असे पंकज फडणीस यांनी याचिकेत मागणी केली होती.त्यावर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अलोक अराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंठपीठासमोर याचिकेवर सुनावणी झाली.न्यायालय म्हणाले, “तुम्ही तुमच्या याचिकेत विनंती केली आहे की,आम्ही त्यांना निर्देश द्यावेत की,त्यांनी व्यक्तिशः अभ्यास करावा आणि तुमच्या याचिकेनुसार वाचन करावे,अशी सक्ती न्यायालय करू शकत नाही?”, असा उलट सवाल न्यायालयाने याचिकाकर्त्याला केला.त्यानंतर याचिकाकर्ता न्यायालयात म्हणाला की, “ते विरोधी पक्षनेते आहेत आणि ते गोंधळ तयार करत आहेत.जर ते पंतप्रधान झाले,तर ते कहरच करतील.” याचिकाकर्त्याच्या पंतप्रधान होण्याबद्दलच्या युक्तिवादावर न्यायालय म्हणाले, “आम्हाला माहिती नाही.तुम्हाला माहिती आहे का की ते पंतप्रधान होणार आहेत?” तुम्ही कशावरून सांगताय की ते पंतप्रधान होणार?न्यायालयाने याचिकाकर्त्याला सांगितले की,वीर सावरकरांचे पणतू आधीच पुण्यातील न्यायालयात गेले आहेत.त्यांनी बदनामीची(मानहानी) याचिका दाखल केली आहे.याच मुद्द्यावर तिथे अगोदरपासून सुनावणी सुरू आहे. याचिकाकर्त्याने वर्षाच्या सुरुवातीलाच सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती,पण न्यायालयाने याचिका फेटाळून लावली,असे सांगत न्यायालयाने फडणीस यांचीही याचिका फेटाळून लावली व राहुल गांधी यांना दिलासा दिला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शासन निर्णयात जरी पोपट पक्षीचा उल्लेख नसेल; तरीही एखाद्याला नुकसान भरपाईपासून वंचित ठेवता येणार नाही.. – आता पोपट पक्षांनी नुकसान केल्यास मिळणार भरपाई..

उद्रेक न्युज वृत्त :-शेतकऱ्याने शेतात डाळिंबाची झाडे लावली.पण,अर्ध्याहून अधिकच्या झाडांची फळे ही पोपट पक्षांनी खाऊन नष्ट केली होती.अश्यातच शेतकऱ्याने कृषी विभागास माहिती देऊन पंचनामा...

रखरखत्या उन्हात लग्नसमारंभासाठी प्रवास; बसमध्येच सोडला प्राण.. – आज उष्णतेच्या लाटेचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सध्या स्थितीत नागपूरसह विदर्भाचे तापमान वाढतच आहे.एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून उन्हाची तीव्रता वाढली असून अंगाची लाहीलाही होत आहे.एप्रिल महिन्यातच ही स्थिती आहे,तर...

असे कोण करते सांगा? ग्रामसेविकेने शासकीय निधी सरकारी कामासाठी न वापरता चक्क व्याजाने दिले वाटून..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शासन स्तरावरून गावगाड्याचा सर्वांगीण विकास व्हावा,यासाठी वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून ग्रामपंचायतीला मोठ्या प्रमाणावर निधीचे वाटप करण्यात येते.मात्र,काही लोकसेवक मनमर्जिने कामे करून घरचीच...

भरधाव वेगातील रेतीने भरलेला ट्रॅक्टर उलटला अन् तरणेबांड पोरगा दगावला..!

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-ट्रॅक्टरमध्ये रेती भरून रेतीची साठवणूक करण्यासाठी भरधाव वेगात निघालेला रेतीने भरलेला ट्रॅक्टर उलटला आणि चालत्या ट्रॅक्टरवरून खाली कोसळलेल्या चालकाच्या अंगावरून ट्रॅक्टरच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!