उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- जगाचा पोशिंदा म्हटल्या जाणारे शेतकरी बांधव रात्रंदिवस पोटाची खडगी भरण्यासाठी जीवाचे रान करून कधी तुडतुडा,कधी रानटी जनावरांच्या हैदोषांवर मात करीत शेतात पिके उभी करतात; कित्तेक ठिकाणी सिंचनाची सोय नसलेले शेतकरी कृषी पंपाच्या माध्यमातुन रब्बी पिकाची लागवड करतात.मागिल दोन वर्षापासुन देसाईगंज तालुक्यात कृषिपंपांना विजपुरवठ्याचा प्रश्न सातत्याने निर्माण झाला असुन सुरळित पाणिपुरवठा होत नसल्याने धान पिक धोक्यात येवुन करपण्याच्या मार्गावर लागले आहे.अशातच देसाईगंज तालुक्यातील शेतकरी बांधवांनी २६ फेब्रुवारी २०२४ पासून कृषिपंपांना १२ तास वीज पुरवठा करण्यात यावा; यासाठी उपविभागीय कार्यालय देसाईगंज याठिकाणी आंदोलन तसेच आमरण उपोषणाचा पावित्रा घेतला आहे.त्यानुसार आजचा आठवा दिवस सुरू असून शेतकरी बांधवांच्या विविध मागण्या कां पूर्ण करण्यात येत नाहीत.राज्य सरकारचे खरे सूत्रधार असलेले उपमुख्यमंत्री यांचे,ऊर्जा खात्याचे मंत्री यांचे, पालकमंत्रीही यांचेच,एवढेच नाही तर खासदार,आमदारही यांचेच.तरीही देसाईगंज तालुक्यातील शेतकरी वाऱ्यावर का? पाण्याअभावी अर्धमेल्या झालेल्या पिकांचा बळी घेण्याचे पाप कोण करीत आहे? आता हातातून पीक गेले म्हणून बळीराजाने आत्महत्या करावी; याची वाट हे निष्ठूर सरकार पाहात आहे का? शेतकरी बांधवांच्या जीवावर उठेलेल्या निष्ठुर सरकारच्या निषेधार्थ गावोगावी जाऊन मुर्दाड भाजप सरकारचा जाहीर निषेध करणार असल्याचे असंघटित कामगार सेल,काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष छगन शेडमाके यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

