Wednesday, April 15, 2026
Homeगडचिरोलीबॅकफूटवर गेलेले नक्षलवादी आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर सक्रिय... - राज्याचे अन्न व...

बॅकफूटवर गेलेले नक्षलवादी आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर सक्रिय… – राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना ‘टार्गेट’ करण्याची धमकी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-प्रत्येक निवडणुकीत उच्छाद मांडणाऱ्या नक्षलवाद्यांनी निवडणुकीवर यावेळी बहिष्कार टाकण्यासोबतच राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा अहेरी मतदारसंघातील विधानसभा महायुतीचे उमेदवार धर्मरावबाबा आत्राम यांना ‘टार्गेट’ करण्याची धमकी दिली आहे.नक्षलवादी आगामी काळात हिंसात्मक कृतींवर उतरण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे.अहेरी भागातील जिमलगट्टा परिसरात नक्षलवाद्यांनी बॅनर्स लावून याबाबत आपले ‘उलगुलान’ केल्याचे दिसून येत आहे.
नक्षल्यांच्या बॅनर्समध्ये विविध बाबींचा उल्लेख करण्यात आला आहे.यामध्ये प्रामुख्याने मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्यावर व महायुती सरकारवर टीकाटिप्पणी करण्यात आली आहे.पीपल्स लिबरेशन गुरील्ला आर्मी अर्थात पीएलजीएचा सप्ताह २ ते ७ डिसेंबर या कालावधीत पाळण्यात यावा,याचकाळात भारत बंद ठेवावा,असे आवाहन नक्षल्यांनी बॅनरमधून केले आहे.भाजप सरकारचा निषेध करीत कंत्राटदारांनी विकासकामे बंद करावीत.सर्व गाव पोलिस पाटलांनी राजीनामा द्यावा,मंत्री आत्राम यांचा निषेध करावा,असे आवाहन नक्षलवाद्यांनी बॅनर्समधून केले आहे.पोलिसांच्या वाढत्या कारवायांमुळे बॅकफूटवर गेलेले नक्षलवादी आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर सक्रिय झाल्याने पोलिसांच्या अडचणीत वाढ झाली आहे.अहेरी एरिया कमिटी अशा आशयाचे हे बॅनर्स अहेरी उपविभागात लावण्यात आल्याने उमेदवारांचीही धाकधूक वाढली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १६ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत...

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील परिसरात वाघिणीने धुमाकूळ घालून गुरुवार,१९ मार्च २०२६ रोजी बाम्पेवाडा येथील ५० वर्षीय वसंत गणपत मेश्राम यांचा जीव घेतला...

आता प्रत्येक लाभार्थी कुटुंबास मिळणार तीन लिटर रॉकेल..

उद्रेक न्युज वृत्त :-जमाना कितीही बदलला तरीही 'जुनं ते सोनं' अशी अवस्था केवळ आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर झाल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र राज्याच्या विविध...

फरार आरोपींवर ‘लुकआउट सर्क्युलर’ नंतर मालमत्ता जप्तीची प्रक्रिया सुरू.. – स्फोटके बनवणाऱ्या कंपनीतील स्फोट प्रकरण..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या काटोल तालुक्यातील राऊळगाव येथील स्फोटके बनवणाऱ्या एसबीएल कंपनीत १ मार्च २०२६ रोजी भीषण स्फोट झाला होता.एसबीएल कंपनीच्या आवारात झालेल्या भीषण स्फोटात आतापर्यंत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!