- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-शिवसेनेचे(शिंदे गट)आमदार संतोष बांगर हे नेहमीच आपल्या रोखठोक विधानांसाठी ओळखले जातात. आपल्या रोखठोक भूमिकेमुळे अनेकदा त्यांना अडचणींचा सामना करावा लागला.त्यात आता आणखी एकाची भर पडली आहे.बाहेरगावी असलेल्या कार्यकर्त्यांची लिस्ट दोन-तीन दिवसांमध्ये द्यावी,त्यांना सांगा गाड्या करा,गाड्यांसाठी जे काही लागते ते त्यांना फोन पे करतो, त्यांना सांगा येण्या-जाण्याचा जे काही लागते ते आम्हाला सांगा,असे आर्थिक प्रलोभन देणारे वक्तव्य आमदार संतोष बांगर यांनी केल्याने खळबळ उडाली आहे.हिंगोलीच्या कळमनुरी येथे आमदार संतोष बांगर यांनी एका कार्यक्रमात हे विधान केले आहे.
आमदार संतोष बांगर हे येत्या २४ तारखेला आपला उमेदवारी अर्ज शिवसेना शिंदे गटाकडून दाखल करणार आहेत.कळमनुरी मध्ये आयोजित एका कार्यक्रमांमध्ये आमदार बांगर यांनी मतदारांना आणण्यासाठी फोन पे ने पाठवा असे वक्तव्य केले होते.या वक्तव्यामुळे आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाने केला आहे.आमदार बांगर यांनी मतदारांना पैशाचे प्रलोभन दिल्याने निवडणूक आयोगाने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे इच्छुक उमेदवार अजित मगर यांनी केली आहे.निवडणूक विभागाच्या वतीने आमदार संतोष बांगर यांना त्या वक्तव्याचा खुलासा सादर करण्याची नोटीस बजावली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.पुढील २४ तासांमध्ये आमदार बांगर यांनी खुलासा सादर करावा; असे त्या नोटीसमध्ये म्हटले आहे.
- Advertisement -

