- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-सध्या स्थितीत महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे.त्यातच घरकुल बांधकामासाठी शासन स्तरावरून तुटपुंजे अनुदान दिले जात आहे.वाढती महागाई लक्षात घेता केंद्र सरकारच्यावतीने सुरू असलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या हप्त्यात ग्रामीण भागात किमान ३ लाखांपर्यंत वाढ करण्याची मागणी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.नामदेव किरसान यांनी
केली.यासोबतच केंद्र सरकारच्यावतीने सुरू असलेल्या जलजीवन मिशन योजनेत मोठा भ्रष्टाचार होत असून, अजूनही बऱ्याच गावात नळ पोहोचले नाहीत.ज्या गावात नळ पोहोचले,त्या ठिकाणी पाणी नाही आणि पाणी पोहोचले त्या ठिकाणी अशुद्ध पाणी मिळत असून नारिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.सदर योजनेच्या अंमलबजावणीत सरकारने जातीने लक्ष घालून प्रत्येक नागरिकांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळेल,याकरिता प्रयत्न करण्याची मागणीही त्यांनी केली.गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्र आदिवासीबहुल असून आदिवासींचे जल,जंगल आणि जमिनीवरचे हक्क अबाधित राहण्यासाठी पेसा कायदा तयार करण्यात आला.मात्र,प्रशासनाकडून यामध्ये ढवळाढवळ केली जाते,हे योग्य नसल्याची भावना खासदार किरसान यांनी व्यक्त केली.केंद्र सरकारचे अर्थसंकल्पीय अधिवेशन दिल्ली येथे सुरू असून राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चे प्रसंगी ते बोलत होते.
- Advertisement -

